वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मतदानयंत्रांतील बिघाडामुळे सोमवारच्या पोटनिवडणुकीत झालेल्या गोंधळावर फेरमतदानाचा उतारा निश्चित करण्यात आला असून, महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियातील ४९, उत्तर प्रदेशातील कैरनामधील ७३ व नागालँडमधील एक अशा एकूण १२३ मतदानकेंद्रावर आज, मंगळवारी फेरमतदान घेण्यात येईल. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या काळात हे मतदान होईल, असे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
भंडारा-गोंदियात ४९ केंद्रांवर फेरमतदान
महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघातील ४९ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. उद्या, ३० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघातील ७३ मतदान केंद्रे आणि नागालँडमधील एका मतदान केंद्रावरही उद्याच फेरमतदान घेण्यात येणार आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात सोमवारी मतदानादरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला. बिघाड दुरुस्त करण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागल्याने कंटाळून अनेक मतदार मतदान न करता परत गेले. व्हीव्हीपॅटमध्ये वापरण्यात येणाऱ्या थर्मोसेन्सिटिव्ह पेपरला उन्हाचा तडाखा बसल्याने अडथळे आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील ४९ मतदान केंद्रांवर पुन्हा उद्या मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदानयंत्रांतील बिघाडामुळे सोमवारच्या पोटनिवडणुकीत झालेल्या गोंधळावर फेरमतदानाचा उतारा निश्चित करण्यात आला असून, महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियातील ४९, उत्तर प्रदेशातील कैरनामधील ७३ व नागालँडमधील एक अशा एकूण १२३ मतदानकेंद्रावर आज, मंगळवारी फेरमतदान घेण्यात येईल. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या काळात हे मतदान होईल, असे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
भंडारा-गोंदियात ४९ केंद्रांवर फेरमतदान
महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघातील ४९ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. उद्या, ३० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील कैराना मतदारसंघातील ७३ मतदान केंद्रे आणि नागालँडमधील एका मतदान केंद्रावरही उद्याच फेरमतदान घेण्यात येणार आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात सोमवारी मतदानादरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला. बिघाड दुरुस्त करण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागल्याने कंटाळून अनेक मतदार मतदान न करता परत गेले. व्हीव्हीपॅटमध्ये वापरण्यात येणाऱ्या थर्मोसेन्सिटिव्ह पेपरला उन्हाचा तडाखा बसल्याने अडथळे आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील ४९ मतदान केंद्रांवर पुन्हा उद्या मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.