अ‍ॅपशहर

... म्हणून पाकिस्तानी विद्यार्थ्यांनाही आठवल्या सुषमा स्वराज

दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अडकेल्या भारतीयाला विनाविलंब मदत केली. फक्त भारतीयच नव्हे, तर भारताशी कायम शत्रूत्व पाळणाऱ्या पाकिस्तानच्या अनेक नागरिकांनाही त्यांनी वैद्यकीय कारणांसाठी मदत केली. चीनमधील वुहान शहरात दहशत माजवलेल्या करोना व्हायरसनंतर आता पाकिस्तानी विद्यार्थ्यांनाही सुषमा स्वराज यांची आठवण झाली. भारताने कोणताही विलंब न करता आपल्या नागरिकांना मायदेशी आणलं, पण पाकिस्तानचे अनेक नागरिक चीनमध्येच अडकून आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2020, 6:00 pm
नवी दिल्ली : दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अडकेल्या भारतीयाला विनाविलंब मदत केली. फक्त भारतीयच नव्हे, तर भारताशी कायम शत्रूत्व पाळणाऱ्या पाकिस्तानच्या अनेक नागरिकांनाही त्यांनी वैद्यकीय कारणांसाठी मदत केली. चीनमधील वुहान शहरात दहशत माजवलेल्या करोना व्हायरसनंतर आता पाकिस्तानी विद्यार्थ्यांनाही सुषमा स्वराज यांची आठवण झाली. भारताने कोणताही विलंब न करता आपल्या नागरिकांना मायदेशी आणलं, पण पाकिस्तानचे अनेक नागरिक चीनमध्येच अडकून आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sushma swaraj


सुषमा स्वराज यांचे 'ते' ट्विट शेवटचे ठरले

@MamoonCh_ या नावाने ट्विटर हँडल असलेल्या एका पाकिस्तानी विद्यार्थ्याने सुषमा स्वराज यांच्या एका जुन्या ट्वीटची आठवण करुन दिली आहे. 'आज तुम्ही नसलात तरीही तुमचे शब्द आहेत,' असं हा विद्यार्थी म्हणत आहे. सुषमा स्वराज नेहमीच ट्विटरवर सक्रिय असायच्या. असंख्य वेळा त्यांनी परदेशात संकटात असलेल्या भारतीयांना मदत केली होती. ‘तुम्ही मंगळावरही अडकला असाल, तर भारतीय दुतावास तुमच्या मदतीला येईल’, असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी ८ जून २०१७ रोजी केलं होतं.

करन सैनी नावाच्या एका व्यक्तीने सुषमा स्वराज यांना टॅग करुन ट्वीट केलं होतं की, ‘मी चंद्रावर अडकलो आहे. ९८७ दिवसांपूर्वी मंगळयानातून पाठवलेलं अन्न संपत आहे. मंगळयान-२ कधी पाठवलं जाईल?’ असं ट्वीट या युझरने केलं. यात इस्रोलाही टॅग करण्यात आलं होतं. पण सुषमा स्वराज यांनी दिलेल्या रिप्लायने सर्वांचं मन जिंकून घेतलं होतं.

Sushma Swaraj: मसूदवरून स्वराज पाकिस्तानवर बरसल्या

वुहानमध्ये पाकिस्तानी विद्यार्थी अडकून

चीनमध्ये असलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी भारताकडून शिका असं म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणलं, पण पाकिस्तानचे अनेक नागरिक अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. चीनमध्ये आढळलेल्या करोना व्हायरसने जभभरात दहशत माजवली आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तान मैत्रीचं नातं निभावण्यासाठी स्वतःच्या नागरिकांना सोडून चीनचं कौतुक करण्यात व्यस्त आहे. पाकिस्तान सरकावर पाकिस्तानच्या जनतेचा रोष प्रचंड वाढताना दिसत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज