नवी दिल्ली: करोना योद्धे डॉक्टर, नर्सेस आणि इतरांनी त्यावरील लस घेण्यात मागेपुढे पाहू नये, असं केंद्र सरकारनं म्हटलं. लस घेण्यास पात्र असलेल्यांनी करोना लसीकरणाच्या ( coronavirus vaccination ) सुरक्षेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन, देशातील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आणि निती आयोगाच्या सदस्यांनी केलं आहे. लसीकरणानंतर ( covid19 vaccines ) किरकोळ परिणाम होणं स्वाभाविक आहे. यामुळे लस घेण्यात संकोच करू नये, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
'लस तयार करण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. आरोग्य कर्मचारी, विशेषत: डॉक्टर आणि नर्सेस लस घेण्यास नकार देत असतील तर ही चिंता वाढवणारी बाब आहे. हा संसर्ग पुढे काय स्वरुप घेईल आणि ते किती मोठे असू शकेत हे आम्हाला माहित नाही, म्हणून कृपया लसीकरण करा', असं आवाहन निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी केली आहे. भारतात करोना लसीकरणाचा चौथा दिवस होता.
दारु प्यायल्यानंतर डॉक्टरनं घेतला करोनाचा डोस, तब्येत बिघडल्यानं खळबळ
लसीला नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन रोखण्याचा आदेश, वादानंतर माघार
विशेष म्हणजे करोनाविरूद्ध देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पण लसीकरणासाठी अपेक्षित उत्साह अद्याप दिसून आलेला नाही. या मागचं कारण म्हणजे लस घेतल्यानंतर होणारे हे 'किरकोळ परिणाम' असल्याचं बोललं जातंय. लसीबद्दल नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि लसीकरण कार्यक्रमाबद्दल जागरूकता नसणं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 'या लसीमुळे थोडी वेदना, हलका ताप, अस्वस्थता, किरकोळ त्रास अशा इतर तक्रारी येऊ शकतात. पण याची भीती बाळगण्याची गरज नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
'लस तयार करण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. आरोग्य कर्मचारी, विशेषत: डॉक्टर आणि नर्सेस लस घेण्यास नकार देत असतील तर ही चिंता वाढवणारी बाब आहे. हा संसर्ग पुढे काय स्वरुप घेईल आणि ते किती मोठे असू शकेत हे आम्हाला माहित नाही, म्हणून कृपया लसीकरण करा', असं आवाहन निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी केली आहे. भारतात करोना लसीकरणाचा चौथा दिवस होता.
दारु प्यायल्यानंतर डॉक्टरनं घेतला करोनाचा डोस, तब्येत बिघडल्यानं खळबळ
लसीला नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन रोखण्याचा आदेश, वादानंतर माघार
विशेष म्हणजे करोनाविरूद्ध देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पण लसीकरणासाठी अपेक्षित उत्साह अद्याप दिसून आलेला नाही. या मागचं कारण म्हणजे लस घेतल्यानंतर होणारे हे 'किरकोळ परिणाम' असल्याचं बोललं जातंय. लसीबद्दल नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि लसीकरण कार्यक्रमाबद्दल जागरूकता नसणं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 'या लसीमुळे थोडी वेदना, हलका ताप, अस्वस्थता, किरकोळ त्रास अशा इतर तक्रारी येऊ शकतात. पण याची भीती बाळगण्याची गरज नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.