नवी दिल्ली : मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी काही राज्यांना अपयश आले असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने या याचिकेवर तातडीने सुनावणीची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मारहाण आणि गोरक्षणासंबंधातील प्रकरणे हाताळताना विविध राज्य सरकारांकडून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या घटना वाढत आहेत, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे.
तातडीने सुनावणी नाही
मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी काही राज्यांना अपयश आले असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.
महाराष्ट्र टाइम्स 19 Jul 2019, 4:00 am