अ‍ॅपशहर

‘हा धोरणांविरोधातील जनादेश नाही’

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फूलपूर येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील अपयश हे भाजपच्या धोरणांविरोधात जनादेश नसल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केले.

Maharashtra Times 19 Mar 2018, 12:44 pm
वृत्तसंस्था, लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yogi-adityanath


उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फूलपूर येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील अपयश हे भाजपच्या धोरणांविरोधात जनादेश नसल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केले. या निकालातून पक्षाने धडा घेतला असून, आगामी निवडणुकांत व प्रामुख्याने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करू, असे ते म्हणाले. भाजप उमेदवारांचा अतिआत्मविश्वास आणि आत्मसंतुष्टता पोटनिवडणुकीतील अपयशला कारणीभूत आहे. यश त्यांच्या ताटात पडेल अशी अपेक्षा ठेवल्याने त्यांनी फार कष्ट केले नाहीत, असे आदित्यानाथ म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज