पाटणा : देशपातळीवर नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) करण्याची गरज नसून, त्याचे समर्थन करता येणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. विधानसभेत बोलताना ते म्हणाले, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ही दर १० वर्षांनी केली जात असल्याने तिला आपल्या सरकारचा तत्त्वत: पाठिंबा आहे. मात्र, जनगणना ही जातीवर आधारित असावी. 'एनआरसी'ची गरज नाही आणि त्याचे समर्थनही नाही. पंतप्रधानही यावर स्पष्टपणे बोलले आहेत.'
देशव्यापी एनआरसीची गरज नाही
देशपातळीवर नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) करण्याची गरज नसून, त्याचे समर्थन करता येणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2020, 4:00 am