अ‍ॅपशहर

'पोलिसांनी मानवी विष्ठा गिळायला लावली'

पोलीस कोठडीतील सुरुवातीच्या त्या ५० दिवसात झालेले अत्याचार आठवले की अजूनही अंगाचा थरकाप उडतो, असं दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी निर्दोष सुटलेल्या मोहम्मद हुसैन फजिली याने सांगितलं. दिल्लीत २००५ ला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात फजिली आणि दुसरा एक आरोपी मोहम्मद रफीक शाह यांची निर्दोष मुक्तता केली.

Maharashtra Times 22 Feb 2017, 12:19 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम they forced feaces into our mouth syas fazili
'पोलिसांनी मानवी विष्ठा गिळायला लावली'


'पोलीस कोठडीतील सुरुवातीच्या त्या ५० दिवसात झालेले अत्याचार आठवले की अजूनही अंगाचा थरकाप उडतो', असं दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी निर्दोष सुटलेल्या मोहम्मद हुसैन फजिली याने सांगितलं.

दिल्लीत २००५ ला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात फजिली आणि दुसरा एक आरोपी मोहम्मद रफीक शाह यांची निर्दोष मुक्तता केली. पोलीस कोठडीत आपल्यावर अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप निर्दोष सुटल्यानंतर फजिलीने केला आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'ने हे वृत्त दिलं आहे.

'गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी आपला शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही प्रकारे प्रचंड छळ करत दबाव टाकला. अजूनही ते दिवस आठवल्यावर अंगाचा थरकाप उडतो. ते आमच्या तोंडात मानवी विष्ठा कोंबायचे आणि नंतर चपाती खावू घालून ती गिळायला लावायचे', असं फजिली म्हणाला. 'मानवी मूत्रही प्यायला भाग पाडले. कोर्टात जर का ह्याबद्दल काही सांगितलं तर यापेक्षाही भयंकर हाल करू', अशा धमक्या पोलिसांनी दिल्या. एवढचं नव्हे तर आपल्याकडून २०० कोऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करवून घेतली', असं फजिलीने सांगितलं.

'अटक केल्यानंतर आम्हाला दिल्लीतील लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. तिथे आम्हाला जमिनीवर झोपवून डिटर्जंटचे पाणी प्यायला लावले. पोलीस कोठडीच्या ५० दिवसानंतर आम्हाला तिहार तुरुंगात हलवण्यात आलं. तिहारमध्ये आमच्यावर कुठलेही अत्याचार झाले नाही. पण तिथल्या गुन्हेगारांकडून हल्ल्याची आम्हाला भीती होती', असं फझिली म्हणाला.

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरलगतच्या परिसरात फजिलीचा शॉल बनवण्याचा व्यवसाय आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोट मालिकेच्या २४ दिवसानंतर २१ नोव्हेंबर २००५ ला फजिलीला त्याच्या घरातून दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केली होती. त्यावेळी तो ३० वर्षाचा होता. यानंतर गेल्या १२ वर्षापासून तो तिहार तुरुंगात होता. १६ तारखेला न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर तो आता श्रीनगरला आपल्या घरी परतला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज