अ‍ॅपशहर

रेल्वे स्टेशन गाठताच पोलीस चक्रावले, चोरट्यांनी गायब केले थेट २ किमीचे रेल्वे ट्रॅक

Robbery News Today : हल्लीच्या जगात काय होईल, याचा काही नेम नाही. असाच प्रकार देशात समोर आला आहे. इथे चोरट्यांनी चक्क रेल्वेचे ट्रॅकच चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2023, 9:50 am
बिहार : चोरीच्या अनेक धक्कादायक घटना आपण पाहिल्या असतील. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. बिहारमध्ये लोकांनी चक्क रेल्वेचे ट्रॅकच चोरीला नेल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे मार्गावरून दोन किलोमीटरचे ट्रॅक चोरीला गेलेत. रेल्वे ट्रॅक चोरीला गेल्याने संपूर्ण रेल्वे विभागात खळबळ उडाली असून पोलीस कसून तपास करत असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime news today


याप्रकरणी रेल्वेने गुन्हा दाखल केला असून ही चोरी नेमकी कोणी केली याचाही शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. बिहारच्या मध्य रेल्वेच्या समस्तीपुर रेल्वे विभागातमध्ये काही वर्षांपूर्वी साखर कारखान्याला जाण्यासाठी रेल्वेची लाईन टाकण्यात आली होती. साखर कारखाना बंद झाल्यानंतर या रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूकही ठप्प झाली.

साताऱ्यात मित्राला संपवून तिघांनी गाठली दापोली; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने झडप घालून घेतलं ताब्यात
यामुळे रेल्वे या लाईनचा भंगार म्हणून लिलाव करणार होती. मात्र, लिलावापूर्वीच साखर कारखान्याकडे जाणारा दोन किलोमीटरचा रेल्वे मार्ग चोरीला गेला. काही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने चोरी घडवून आणण्याचे बोलले जात आहे तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख