अ‍ॅपशहर

... म्हणून याला फसलेलं लॉकडाऊन म्हणतो : राहुल गांधी

संसर्गाचा विचार करता भारत जगभरात सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोविड -१९ ची लागण झालेल्या रूग्णांची संख्या इटलीच्या तुलनेत जास्त आहे. काही दिवसांपूर्वीच बाधितांच्या संख्येच्या दृष्टीने भारताने चीनलाही मागे सारले होते. अमेरिकेत जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2020, 2:41 pm
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. इतर देशांनी करोना रुग्ण कमी झाल्यानंतर अनलॉक केलं आणि आपण करोना रुग्ण वाढत असतानाच देश खुला केला, असं चित्र दाखवणारा एक आलेख त्यांनी शेअर केला आणि फसलेलं लॉकडाऊन असा उल्लेखही केला. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिवसेंदिवस करोना रुग्णवाढीचा आकडा नवा विक्रम गाठत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम this is what a failed lockdown looks like tweets rahul gandhi
... म्हणून याला फसलेलं लॉकडाऊन म्हणतो : राहुल गांधी


भारतात शुक्रवारी करोना रुग्णसंख्येने आतापर्यंतचा सर्वोच्च एक दिवसाचा आकडा गाठला. शुक्रवारी एकाच दिवासत ९८८७ रुग्ण समोर आल्याने एकूण रुग्णसंख्या २ लाख ३६ हजार ६५७ एवढी झाली आहे. सोबतच भारताने करोनाने सर्वाधिक कहर घातलेला देश इटलीलाही मागे टाकलं. शुक्रवारी राहुल गांधी यांनीही युरोपियन देशांमधील आलेख शेअर केले आणि भारतात कशी उलट अंमलबजावणी होत आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

देशात करोनाची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; केंद्राने जाहीर केली आकडेवारी

स्पेन, जर्मनी, इटली आणि ब्रिटनचा आलेख राहुल गांधींनी शेअर केला, ज्यासोबत भारताचाही आलेख आहे. युरोपियन देशांमध्ये रुग्णवाढीचा दर कमी झाल्यानंतर अनलॉक करण्यात आलं होतं, तर भारतात रुग्णवाढ नसताना लॉकडाऊन होतं, पण रुग्ण वाढत असताना अनलॉक केलं आहे, असं राहुल गांधींनी याद्वारे सांगितलं.

उद्धव ठाकरे यांना माझा फुल्ल सपोर्ट: अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

भारताने इटलीलाही मागे टाकलं

गेल्या काही दिवसात भारतात रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. देशात प्रति १० लाख लोकसंख्येमागे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे हा दर कमी आहे. इटलीशी तुलना केली तर इटलीत प्रति १० लाख लोकसंख्येमागे ५५९ जणांचा मृत्यू झाला. तर इटलीत १ लाख ६४ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशातील करोना उद्रेकाचा वेग पाहिला तर येत्या काळात भारत युरोपियन देशांनाही मागे टाकण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि स्पेनला मागे टाकत भारत पुढील काही दिवसात सर्वात प्रभावित चौथा देश ठरू शकतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज