अ‍ॅपशहर

यंदा मान्सूनचा जोर कमी राहण्याचा अंदाज

केरळच्या सीमेवर आलेल्या मान्सूनचा जोर यंदा कमी राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खरीपाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत. हवामान शास्त्रज्ञ समर चौधरी यांनी खासगी हवामान संस्था स्कायमेटशी बोलताना मान्सून कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2019, 5:31 pm
नवी दिल्लीः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monsoon


केरळच्या सीमेवर आलेल्या मान्सूनचा जोर यंदा कमी राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खरीपाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत. हवामान शास्त्रज्ञ समर चौधरी यांनी खासगी हवामान संस्था स्कायमेटशी बोलताना मान्सून कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

आगामी दोन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होईल. राजधानी दिल्ली आणि एनसीआर भागात साधारणपणे जून महिनाच्या अखेरीला मान्सून दाखल होतो. मात्र, यावर्षी १० ते १५ दिवस उशिराने मान्सून दिल्लीत दाखल होईल, असा अंदाज चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

मान्सूनपूर्व पाऊसही सरासरीपेक्षा कमी राहील. गेल्या ६५ वर्षांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस कमी होण्याची ही दुसरी वेळ असेल. सामान्यपणे मान्सूनपूर्व पाऊस १३१.५ मिलीमीटर होतो. मात्र, यावर्षी हा पाऊस ९९ मिलीमीटर पडला. मान्सून आगमन क्षेत्रात अल-नीनो सक्रीय झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर आणि मध्य भारत तसेच देशाच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळाची स्थिती आहे. राजस्थानमधील चुरू भागात तर तापमानाने अर्धशतक गाठले. अशा परिस्थितीत मान्सून कमी राहण्याचा अंदाज देशासमोर संकट उभे करणारा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज