अ‍ॅपशहर

'नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भीती आवश्यक'

'वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भीती आवश्यक आहे. कायद्याप्रती आदर आणि भीती नसणे ही स्थिती चांगली नाही. रस्त्यांवरील अपघातात दर वर्षी दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि त्यात १८ ते ३५ वयोगटातील तरुणांच्या मृत्यूंची संख्या ६५ टक्के आहे. त्यांचे जीव वाचवायला नको का,' असा सवाल करीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मोटर वाहन कायद्यातील दुरुस्त्यांमुळे भरमसाठ वाढलेल्या आर्थिक दंडांचे समर्थन केले.

महाराष्ट्र टाइम्स 6 Sep 2019, 4:00 am
नवी दिल्ली : 'वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भीती आवश्यक आहे. कायद्याप्रती आदर आणि भीती नसणे ही स्थिती चांगली नाही. रस्त्यांवरील अपघातात दर वर्षी दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि त्यात १८ ते ३५ वयोगटातील तरुणांच्या मृत्यूंची संख्या ६५ टक्के आहे. त्यांचे जीव वाचवायला नको का,' असा सवाल करीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मोटर वाहन कायद्यातील दुरुस्त्यांमुळे भरमसाठ वाढलेल्या आर्थिक दंडांचे समर्थन केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitin-gadkari


सरकारने पैसा कमावण्यासाठी किंवा लोभापोटी मोटर वाहन नियमांचे उल्लंघनादाखल दंडांची रक्कम वाढवलेली नसल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. देशात दर वर्षी पाच लाख अपघात होतात आणि दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. सरकारला जास्त दंड करण्याची इच्छा नाही, असे गडकरी म्हणाले. सर्वांनी कायद्याचे पालन करावे आणि दंड देण्याची वेळच येऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. १ सप्टेंबरपासून अंमलात आलेल्या वाढीव दंडांची अंमलबजावणी मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांनी करण्यास नकार दिला आहे. पण, अन्य राज्यांमध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघनादाखल वसूल केल्या जाणाऱ्या दंडांच्या रकमांमुळे रोष निर्माण झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज