अ‍ॅपशहर

तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव सैन्याच्या जवानांनी उधळून लावला. सैन्याच्या या कारवाईत नौगाममध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

Maharashtra Times 11 Jul 2017, 2:12 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three terrorist killed in kashmir
तीन दहशतवाद्यांना कंठस्नान


काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव सैन्याच्या जवानांनी उधळून लावला. सैन्याच्या या कारवाईत नौगाममध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

रविवारी रात्री नियंत्रण रेषेवर नौगाम क्षेत्रात पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना जवानांनी रोखले. या दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र त्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. यानंतर सोमवारी संध्याकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.

पाककडून उल्लंघन

रविवारी पूंछमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पूंछमध्येच शनिवारी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक जवान हुतात्मा झाला. त्याच्या पत्नीचाही या गोळीबारात मृत्यू झाला होता. यानंतर भारतीय सैन्यानेही पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त केली होती. यात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज