अ‍ॅपशहर

तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

दक्षिण काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या धडक कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. अनंतनागमधील वाणी हामा गावात ही कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra Times 17 Jul 2017, 10:29 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three terrorists killed in jks anantnag encounter underway
तीन दहशतवाद्यांना कंठस्नान


दक्षिण काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या धडक कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी या कारवाईबाबत माहिती दिली.

अनंतनागमधील वाणी हामा गावात ही कारवाई करण्यात आली आहे. लष्कराच्या कारवाईत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले असून अद्याप कारवाई संपलेली नाही, असे कालिया यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अनंतनाग येथील बीजबेहरा येथे आज लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून धडक शोधमोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यात एक जण जखमी झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज