हैदराबाद: तीन मुलांचे पालनपोषण करणे अशक्य झालेल्या एका गरीब शेतकऱ्याने एका मुलीचा गळा चिरून तिची हत्या केली. ही घटना संगारेड्डी जिल्ह्यातील गोंगुलुरूतील आदिवासी पाड्यावर घडली. भविष्यात आपण तिन्ही मुलांचे पोट भरू की नाही या चिंतेत असल्याने या शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
जीवा असे ३० वर्षीय शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या अंगावर कर्जही झाले आहे. लॉकडाउमुळे जीवावर मोठा परिणाम होउन त्याला रोजचा खर्च चालवणे कठीण होऊ लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना गुरुवारी रात्री घडली. घटना घडली तेव्हा जीवाचे कुटुंब झोपडीच्या अंगणात दोन चटयांवर झापले होते. जीवा, त्याची पत्नी एका चटईवर झोपले होते, तर दुसऱ्या चटईवर दोन मुली त्यांच्या चुलतीसोबत झोपल्या होत्या.
रात्री सुमारे १०.३० च्या सुमाराला जीवाने अचानक आरडाओरड करणे सुरू केले. त्यामुळे सर्वांना जाग आली. मुलगी कुठे दिसत नाही, असे म्हणत तो आरडू लागला. त्यानंतर त्याने आसपास तिला शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातात काठी होती. शोधल्यानंतर मुलीचा मृतदेह झोपडीपासून काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक श्रीधर रेड्डी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.
मात्र, जीवाच्या अंगावर काही रक्ताचे डाग असल्याचे त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी जीवाला काही प्रश्न विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्याने आपणच मुलीला मारल्याचे कबूल केले. आपण आर्थिक संकटात सापडल्यानंतर आता काय करावे, पुढे काय होईल याची चिंता सतावत असल्याचे जीवा म्हणाला. यापुढे आपण तीन-तीन मुलांची काळजी घेऊ शकणार नाही, असे आपल्याला वाटल्याचेही त्याने सांगितले. यातूनच हे पाऊल उचलल्याचे तो म्हणाला.
जीवा असे ३० वर्षीय शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या अंगावर कर्जही झाले आहे. लॉकडाउमुळे जीवावर मोठा परिणाम होउन त्याला रोजचा खर्च चालवणे कठीण होऊ लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना गुरुवारी रात्री घडली. घटना घडली तेव्हा जीवाचे कुटुंब झोपडीच्या अंगणात दोन चटयांवर झापले होते. जीवा, त्याची पत्नी एका चटईवर झोपले होते, तर दुसऱ्या चटईवर दोन मुली त्यांच्या चुलतीसोबत झोपल्या होत्या.
रात्री सुमारे १०.३० च्या सुमाराला जीवाने अचानक आरडाओरड करणे सुरू केले. त्यामुळे सर्वांना जाग आली. मुलगी कुठे दिसत नाही, असे म्हणत तो आरडू लागला. त्यानंतर त्याने आसपास तिला शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातात काठी होती. शोधल्यानंतर मुलीचा मृतदेह झोपडीपासून काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक श्रीधर रेड्डी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.
मात्र, जीवाच्या अंगावर काही रक्ताचे डाग असल्याचे त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी जीवाला काही प्रश्न विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्याने आपणच मुलीला मारल्याचे कबूल केले. आपण आर्थिक संकटात सापडल्यानंतर आता काय करावे, पुढे काय होईल याची चिंता सतावत असल्याचे जीवा म्हणाला. यापुढे आपण तीन-तीन मुलांची काळजी घेऊ शकणार नाही, असे आपल्याला वाटल्याचेही त्याने सांगितले. यातूनच हे पाऊल उचलल्याचे तो म्हणाला.