अ‍ॅपशहर

आचारसंहितेचं उल्लंघन, मोदींविरोधात टीएमसीची तक्रार

​​निवडणूक प्रचार संपल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याचं टीव्हीवर प्रक्षेपण होत असून हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत तृणमूल काँग्रेसने मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तृणमूलने आयोगाला चिठ्ठी लिहून मोदींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2019, 10:56 am
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम narendra-modi15


निवडणूक प्रचार संपल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याचं टीव्हीवर प्रक्षेपण होत असून हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत तृणमूल काँग्रेसने मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तृणमूलने आयोगाला चिठ्ठी लिहून मोदींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेला गेले आहेत आणि गेल्या दोन दिवसांपासून या दौऱ्याला मीडियामधून प्रचंड प्रसिद्धी दिली जात आहे. शिवाय प्रचारबंद असताना मोदींनी मीडियाशी संवादही साधला आहे. तसेच केदारनाथच्या विकासाच्या मास्टर प्लानचीही घोषणा केली आहे. हे आचारसंहितेचं मोठं उल्लंघन आहे, त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तृणमूलने या चिठ्ठीतून केली आहे. दरम्यान, मोदी यांनी केदारनाथमध्ये १८ तास ध्यानधारणा केल्यानंतर ते ब्रदीनाथलाही पोहोचले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज