सालेम (तामिळनाडू)
'घरात शौचालय नसल्यामुळं लग्नानंतरच्या दुसऱ्याच दिवशी रागानं माहेरी गेलेल्या पत्नीच्या विरहात पतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे. घराजवळच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उजेडात आली.
'टॉयलेट: एक प्रेमकथा' या चित्रपटाचा दु:खद सिक्वेल वाटावी अशी ही घटना सालेम जिल्ह्यातील कोट्टाडोंगापट्टी गावात घडलीय. चेल्लातुरई असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. बीई झालेला चेल्लू सुपर मार्केटमध्ये कामाला होता. त्यानं दीपा नावाच्या तरुणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. दोघांच्या हट्टाखातर पालकांनी लग्नास परवानगी दिली होती. मागील रविवारी त्यांचा विवाह झाला. सासरी आल्यानंतर दीपाला कळलं की घरात शौचालय नाही. घरातील सगळे सार्वजनिक शौचालयाचा वापर करत होते. त्यामुळं दीपाचं चेल्लूशी भांडण झालं. घरात शौचालय बांधलं जात नाही तोपर्यंत चेल्लूनं हॉटेलमध्ये खोली बुक करावी, अशी अट दीपानं घातली. मात्र, हॉटेलची खोली बुक करण्याची ऐपत नसल्यानं चेल्लूनं दहा दिवसांच्या आत शौचालय बांधण्याचं वचन दिलं. दीपा त्यासाठी राजी झाली नाही. उलट घर सोडून माहेरी निघून गेली.
'पत्नीला त्रास देऊ नका'
दीपाचं मन वळवण्यासाठी चेल्लू तिच्या घरीही गेला होता. मात्र, तिनं परत येण्यास नकार दिला. त्यामुळं त्याला प्रचंड नैराश्य आलं. दीपाच्या नकारानंतर घरी परतल्यानंतर त्यानं रात्री घराजवळील विहिरीत उडी मारली. आत्महत्या करण्याआधी त्यानं सुसाइड नोट लिहिली आहे. 'माझ्या मृत्यूसाठी मी स्वत: जबाबदार आहे. त्यामुळं घरच्यांनी किंवा पोलिसांनी दीपाला त्रास देऊ नये, असं त्यानं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.
'घरात शौचालय नसल्यामुळं लग्नानंतरच्या दुसऱ्याच दिवशी रागानं माहेरी गेलेल्या पत्नीच्या विरहात पतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे. घराजवळच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उजेडात आली.
'टॉयलेट: एक प्रेमकथा' या चित्रपटाचा दु:खद सिक्वेल वाटावी अशी ही घटना सालेम जिल्ह्यातील कोट्टाडोंगापट्टी गावात घडलीय. चेल्लातुरई असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. बीई झालेला चेल्लू सुपर मार्केटमध्ये कामाला होता. त्यानं दीपा नावाच्या तरुणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. दोघांच्या हट्टाखातर पालकांनी लग्नास परवानगी दिली होती. मागील रविवारी त्यांचा विवाह झाला. सासरी आल्यानंतर दीपाला कळलं की घरात शौचालय नाही. घरातील सगळे सार्वजनिक शौचालयाचा वापर करत होते. त्यामुळं दीपाचं चेल्लूशी भांडण झालं. घरात शौचालय बांधलं जात नाही तोपर्यंत चेल्लूनं हॉटेलमध्ये खोली बुक करावी, अशी अट दीपानं घातली. मात्र, हॉटेलची खोली बुक करण्याची ऐपत नसल्यानं चेल्लूनं दहा दिवसांच्या आत शौचालय बांधण्याचं वचन दिलं. दीपा त्यासाठी राजी झाली नाही. उलट घर सोडून माहेरी निघून गेली.
'पत्नीला त्रास देऊ नका'
दीपाचं मन वळवण्यासाठी चेल्लू तिच्या घरीही गेला होता. मात्र, तिनं परत येण्यास नकार दिला. त्यामुळं त्याला प्रचंड नैराश्य आलं. दीपाच्या नकारानंतर घरी परतल्यानंतर त्यानं रात्री घराजवळील विहिरीत उडी मारली. आत्महत्या करण्याआधी त्यानं सुसाइड नोट लिहिली आहे. 'माझ्या मृत्यूसाठी मी स्वत: जबाबदार आहे. त्यामुळं घरच्यांनी किंवा पोलिसांनी दीपाला त्रास देऊ नये, असं त्यानं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.