अ‍ॅपशहर

विमान प्रवासापेक्षा रेल्वे प्रवास महागला!

​​दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे तिकीटाच्या दरातसुद्धा वाढ झाली आहे. अशातच रेल्वे प्रवास विमान प्रवासापेक्षा जास्त महाग झाल्याचं समोर येत आहे.

Mumbai Mirror 13 May 2019, 3:08 pm
कमल मिश्रा/सतीश नंदगांवकर, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tickit


दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे तिकीटाच्या दरातसुद्धा वाढ झाली आहे. अशातच रेल्वे प्रवास विमान प्रवासापेक्षा जास्त महाग झाल्याचं समोर येत आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सवरून दिल्लीला रवाना होणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचं एसी प्रथम श्रेणीचं तिकीट तीन आठवडे आधी बुक करूनही मुंबई ते दिल्ली विमान प्रवासापेक्षा महाग झालं आहे. तर दुसरीकडे, गोरखपूर ते मुंबई या प्रवासासाठी सुविधा एक्सप्रेस या ट्रेनच्या एसी सेकंड टायरसाठी प्रत्येकी ६,६,१० रूपये भाडं आहे. याच मार्गावरून हवाई मार्गाने जाण्यासाठी जवळपास तितक्याच रकमेत चार जणांचा विमान प्रवास होऊ शकतो.

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रविंदर भाकर यांना रेल्वेच्या वाढलेल्या तिकिट किमतीविषयी विचारले असता, 'आत्याधुनिक सुविधा असलेल्या रेल्वेमध्ये तिकिटाची वाढ झाली आहे. तसंच तात्काळ तिकिट करण्यासाठी वेगळे पैसे भरावे लागतात.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज