नवी दिल्ली : तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क मिळवून देणारे विधेयक सामाजिक न्याय मंत्रालयाने कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. संसदीय समितीने सुचविलेल्या नऊ दुरुस्त्या विधेयकात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तृतीयपंथ या संकल्पनेची व्याख्याही त्यामध्ये करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या गटाने विधेयकावर चर्चा केली असून, विधेयकाबाबत सुचविलेल्या सूचना त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आता ते कॅबिनेटकडे पाठवण्यात येईल.
तृतीयपंथीयांच्या हक्काचे विधेयक कॅबिनेटकडे
तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क मिळवून देणारे विधेयक सामाजिक न्याय मंत्रालयाने कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवले आहे...
Maharashtra Times 19 Mar 2018, 3:27 am