अ‍ॅपशहर

एका बकरीमुळं घडलं होतं तिहेरी हत्याकांड; तब्बल २४ वर्षांनंतर लागला निकाल, त्या १४ जणांना...

Triple Murder Case In Up: या घटनेत दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला तर, एका व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना जिल्हा रुग्णालयाबाहेरच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केली

Authored byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2022, 10:33 am
उत्तर प्रदेशः तिहरी हत्याकांडात तब्बल २४ वर्षांनंतर १४ जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी बुधवारी फास्ट ट्रॅक कोर्टाने आपला महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पोलिसांनी एकूण १४ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर आरोपींना ५६ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास प्रत्येकी आरोपीच्या शिक्षेच्या कालावधीत दोन-दोन वर्षांपर्यंत वाढ होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम triple murder case in up


एका बकरीमुळं घडलेल्या या घटनेमुळं तीन जणांना जीव गमवावा लागला होता. २४ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधील श्रावस्ती जिल्ह्यातील रज्जब गावात हा प्रकार घडला आहे. जमील नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात बांधलेली बकरी दोर तोडून पळून गेली. ही बकरी सत्तार नावाच्या व्यक्तीच्या शेतात गेली. त्यानंतर बकरीला परत आणण्यासाठी गेलेल्या जमीलच्या मुलाल सत्तारने शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला पोहोचला की दोघांनीही काही माणसं बोलवून एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

वाचाः मुंबईच्या डॉक्टरला आला व्हिडिओ कॉल; बोलत असतानाच महिला झाली विवस्त्र, पुढे जे घडलं ते धक्कादायक

या घटनेत दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला तर, एका व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना जिल्हा रुग्णालयाबाहेरच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांनी १६ जणांविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, त्याचदरम्यान दोन आरोपींचे निधन झाले. त्यानंतर हे प्रकरणा फास्ट ट्रॅक कोर्टात पोहोचले.

वाचाः पर्यटकांसाठी गुड न्यूज! सातारा जिल्ह्यात साकारणार ‘नवे महाबळेश्वर’; या गावांचा असणार समावेश

न्यायाधीश अजय सिंह यांनी या प्रकरणात मोहर्रम अली, चुन्नू, बधई, दौलत, जमीर, दिलबहार, मकबूल, साबिर, कादिर, कयूम, मंगरे, नईमुल्ला, बाऊस, निवासी तुरहनी रज्जब, अशा एकूण १४ जणांना हत्याकांडात दोषी असल्याचं सिद्ध करत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच, प्रत्येकी ५६ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची भरपाई न केल्यास दोन वर्षात शिक्षेच्या कालावधीत वाढ करण्याचे आदेशही दिले आहेत.

वाचाः गुजरातच्या व्यापाऱ्याचे कोट्यवधींचे हिरे हडपण्याचा होता डाव; पण एका संशयाने घडलं भलतंच
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख