नवी दिल्ली : काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील किमान २० तरुण बेपत्ता झाले असून, ते दहशतवादी संघटनेत दाखल झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी दुर्गम भागात फिरत असून, सरकारविरोधात स्थानिक नागरिकांना भडकवत आहेत. इंटरनेट बंद असल्यामुळे दहशतवाद्यांना संपर्कासाठी स्वत: हिंडावे लागत आहे. स्थानिक तरुणांची दहशतवादी गटांतील भरती दोन वर्षांनंतर सुरू झाली असून, १५ ते २५ वयोगटातील तरुणांना लक्ष्य केले जात आहे, असे समजते.
वीस काश्मिरी तरुण बेपत्ता
काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील किमान २० तरुण बेपत्ता झाले असून, ते दहशतवादी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2019, 4:00 am