गोड्डा (झारखंड) : गाय चोरल्याच्या संशयावरून झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात गावकऱ्यांनी दोन मुस्लिम तरुणांची मारहाण करून हत्या केली. बहुसंख्येने आदिवासी असलेल्या डुल्लू गावांतील मुन्शी मुर्मू आणि इतरांच्या घरातून पाचजणांनी म्हशी चोरल्याचा आरोप होता. म्हशी दिसत नसल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी या पाच जणांचा पाठलाग केला. पहाटेच्या सुमारास जवळच्या बांकती गावाजवळ त्यांना म्हशीसह पकडण्यात आले. त्यात सैराबुद्दीन अन्सारी (वय ३५) आणि मुर्तजा अन्सारी (वय ३०) यांचा मारहाणीत मृत्यू झाला. तर तिघे पळून जाण्याच यशस्वी झाले. मुर्मूसह चौघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
म्हैसचोरीवरून हत्या
गाय चोरल्याच्या संशयावरून झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात गावकऱ्यांनी दोन मुस्लिम तरुणांची मारहाण करून हत्या केली...
PTI 14 Jun 2018, 4:06 am