अ‍ॅपशहर

बर्फवृष्टीने दोन NIT विद्यार्थ्यांचा मृत्यू

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह शुक्रवारी मनाली येथील शिकारी देवी मंदिराजवळ गोठलेल्या अवस्थेत सापडले आहेत. अक्षय कुमार आणि नवनीत राणा अशी या विद्यार्थ्यांची नावे असून ६ जानेवारीपासून दोघेही बेपत्ता होते.

Suresh Sharma | Maharashtra Times 14 Jan 2017, 2:32 pm
टाइम्स न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two nit students freeze to death in hills of himachal pradesh
बर्फवृष्टीने दोन NIT विद्यार्थ्यांचा मृत्यू


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एनआयटी) बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह शुक्रवारी मनाली येथील शिकारी देवी मंदिराजवळ गोठलेल्या अवस्थेत सापडले आहेत. अक्षय कुमार आणि नवनीत राणा अशी या विद्यार्थ्यांची नावे असून ६ जानेवारीपासून दोघेही बेपत्ता होते. हे दोघे हमीरपुर कॅम्पसमधून बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी मंडी पोलिसांना दिली होती. तेव्हापासून प्रशासनाने ४० सदस्यांची टीम बनवून हॅलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहिमेला सुरुवात केली होती.

शिकारी देवी मंदिर मनालीपासून पुढे १५० किलोमीटरवर असून गेल्या आठवड्यात इथल्या तापमानाचा पारा साधारण उणे १५ डिग्री सेल्सिअस इतकं घसरलं होतं. त्यामुळे थंडीने गारठून या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका मृत्यदेहाजवळ त्यांना एक बॅगही सापडली होती. बॅगमधील आयकार्डवरून तो हमीरपूरच्या सुजानपूर येथे राहणाऱ्या अक्षय कुमारचा मृतदेह असल्याची ओळख पटली. मात्र दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटवता आली नाही. तरीही तो मृतदेह विलासपूर येथील नवनीत राणाचाच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे विद्यार्थी मंदिराच्या दिशेने जात होते किंवा तिथून परतत असताना त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. अक्षय किंवा नवनीत दोघांपैकी एकानेही आपल्या पालकांना ते मंदिरात जाणार असल्याची कल्पना दिली नव्हती. त्यांनी केवळ आपल्या एका मित्रालाच याबाबत सांगितले होते.

सलग ५ दिवस जेव्हा हे दोन्ही विद्यार्थी कॅम्पसमध्ये गैरहजर असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांच्या पालकांनी जनजहेली इथल्या उपविभागीय दंडाधिकारी अश्वनी कुमार यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला रिपोर्टमध्ये एनआयटीचे ४ विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नंतर केवळ २ विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती त्यांना मिळाली.

याप्रकरणी मंडीचे सहाय्यक अधीक्षक कुलभूषण वर्मा यांनी सांगितले की, 'आम्ही या विद्यार्थ्यांचे कॉल डिटेल्स आधी मिळविले. त्यानंतर स्थानिक गिर्यारोहक आणि रहिवाशांसह शोधमोहिम सुरू केली.' दरम्यान दोन्ही मृतदेह मंडीला येथे आणण्यात आले असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविले जातील.
लेखकाबद्दल
Suresh Sharma

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज