बेंगळुरूः व्हॉट्सअॅपवर 'बॅड डॅड' असं स्टेटस ठेवत दोन मुलींनी आपल्या आईसह गळफास घेतल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील बेंगळुरू इथं घडली आहे. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
राजेश्वरी (४३), मनसा (१७) व भूमिका (१५) अशी आत्महत्या करणाऱ्या मायलेकींची नावं आहेत. दक्षिण बेंगळुरूतील राहत्या घरी त्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश्वरीचा पती सिद्धाहचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून त्याच्यात वाद होत. सततच्या वादाला या तिघीही कंटाळल्या होत्या. अखेर त्यांनी या सगळ्यापासून सुटका करून घ्यायचा निर्णय घेतला. सिद्धाह कामानिमित्त तामिळनाडूला गेला असताना त्यांनी स्वत:ला संपवले.
राजेश्वरीचा भाऊ पुट्टूस्वामी यानं आपली भाची मनसा हिचं व्हॉट्सअॅप स्टेटस सर्वप्रथम वाचलं. 'प्रत्येकाला चांगले वडील मिळावेत. माझ्या वडिलांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आमच्या मृत्यूसाठी तेच जबाबदार आहेत,' असं त्यात लिहिलं होतं. स्टेटस वाचल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं पुट्टूस्वामीच्या लक्षात आलं. त्यानं लगेचच बहिणीच्या घरी धाव घेतली. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यानं दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा तिघीही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यानं तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिघींचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
पोलिसांनी राजेश्वरीचा पती सिद्धाहवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.
राजेश्वरी (४३), मनसा (१७) व भूमिका (१५) अशी आत्महत्या करणाऱ्या मायलेकींची नावं आहेत. दक्षिण बेंगळुरूतील राहत्या घरी त्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश्वरीचा पती सिद्धाहचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध होते. या कारणावरून त्याच्यात वाद होत. सततच्या वादाला या तिघीही कंटाळल्या होत्या. अखेर त्यांनी या सगळ्यापासून सुटका करून घ्यायचा निर्णय घेतला. सिद्धाह कामानिमित्त तामिळनाडूला गेला असताना त्यांनी स्वत:ला संपवले.
राजेश्वरीचा भाऊ पुट्टूस्वामी यानं आपली भाची मनसा हिचं व्हॉट्सअॅप स्टेटस सर्वप्रथम वाचलं. 'प्रत्येकाला चांगले वडील मिळावेत. माझ्या वडिलांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आमच्या मृत्यूसाठी तेच जबाबदार आहेत,' असं त्यात लिहिलं होतं. स्टेटस वाचल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं पुट्टूस्वामीच्या लक्षात आलं. त्यानं लगेचच बहिणीच्या घरी धाव घेतली. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यानं दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा तिघीही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यानं तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिघींचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
पोलिसांनी राजेश्वरीचा पती सिद्धाहवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.