अ‍ॅपशहर

uma bharti : कृषी कायदे मागे घेण्याच्या PM मोदींच्या घोषणेने अवाक झालेः उमा भारती

पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर अजूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. आता मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2021, 7:32 pm
भोपाळ: मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर एकामागून एक ट्विट करत आपल्याच पक्षाच प्रश्न उपस्थित केले आहेत. कृषी कायदे मागे घेण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना कठड्यात उभे केले. त्याचवेळी उमा भारती यांनी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकही केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uma bharti praises pm modi slams party and workers
उमा भारतींनी केले PM मोदींचे कौतुक, पण कृषी कायद्यांवरून आपल्याच पक्षाला केले सवाल


कृषी कायदे मागे घेतल्याने खूप दु:ख झाले आहे. चार दिवसांपासून गंगेच्या काठावर आहे. १९ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी तिन्ही कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तेव्हा त्यांचं भाषण ऐकून धक्का बसला, असं म्हणत उमा भारती यांनी तीन दिवसांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.


उमा भारती यांनी पक्ष कार्यकर्त्यांवर कृषी कायद्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. कृषी कायद्यांवरून विरोधकांच्या सततच्या अपप्रचाराला आपण तोंड देऊ शकलो नाही. त्यामुळेच पंतप्रधानांच्या भाषणाने खूप अस्वस्थ झाले होते, असे उमा भारती म्हणाल्या.
PMAY: 'पंतप्रधान आवास योजने'चा लाभ घेत असाल तर बदललेले नियम जाणून घ्या...

उमा भारती यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. कायदे मागे घेऊनही पंतप्रधानांनी आपला मोठेपणा दखावला. असा अद्वितीय नेता युगानुयुगो असू दे, यशस्वी होवो, हीच बाबा विश्वनाथ आणि माता गंगाकडे प्रार्थना करते, असे उमा भारतींनी ट्विटमध्ये म्हटलं.

Param Bir Singh: परमबीर सिंहांना मुंबई पोलिसांकडून धोका, न्यायालयानं दिले 'हे' आदेश

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज