अ‍ॅपशहर

UNचा पाकला झटका; काश्मीरप्रश्नी मध्यस्थीस नकार

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाला विरोध करत हस्तक्षेपाची विनंती करणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाने चांगलाच झटका दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी १९७२च्या शिमला कराराचा हवाला देत काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यात नकार दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2019, 3:58 pm
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाला विरोध करत हस्तक्षेपाची विनंती करणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाने चांगलाच झटका दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी १९७२च्या शिमला कराराचा हवाला देत काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यात नकार दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imran-khan


कलम ३७० हटवण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. त्यात पाकिस्ताननं आततायीपणे भारताशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच भारताच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रसंघात अपिल करत काश्मीरप्रश्नी योग्य भूमिका घेण्यात यावी, अशी विनंती केली होती. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस गुटेरेस यांनी शिमला कराराची आठवण करून देत काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास थेट नकार दिला आहे. 'सरचिटणीस जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याप्रश्नी संयम बाळगावे असे आवाहन त्यांनी केले आहे, ' असे गुटेरेस यांचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी माध्यमांना सांगितलं. गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९७२मधील शिमला कराराचाही हवाला देत याप्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याचंही दुजारिक यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज