अ‍ॅपशहर

'जेटलींना फक्त मोदीच सहन करू शकतात'

'केंद्रातील मोदी सरकारच्या कामावर मी खूष आहे. पण अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कामावर असमाधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच फक्त त्यांना सहन करू शकतात,' अशी खरमरीत टीका भाजप नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जेटली यांच्यावर केली आहे.

Maharashtra Times 17 Oct 2016, 11:08 am
मटा ऑनलाइन वृत्त । अलाहाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम unsatisfied with fm jaitleys performance swamy
'जेटलींना फक्त मोदीच सहन करू शकतात'


'केंद्रातील मोदी सरकारच्या कामावर मी खूष आहे. पण अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कामावर असमाधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच फक्त त्यांना सहन करू शकतात,' अशी खरमरीत टीका भाजप नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जेटली यांच्यावर केली आहे.

उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांची चर्चा करण्यासाठी अलाहाबाद येथे झालेल्या 'इंडिया पॉलिटिकल सेंटर कॉनक्लेव्ह'मध्ये स्वामी बोलत होते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून अर्थमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले स्वामी हे सातत्यानं आर्थिक घडामोडींवर व अर्थमंत्र्यांच्या कामकाजावर भाष्य करत असतात. काल झालेल्या चर्चासत्रातही करांविषयीच्या एका प्रश्नावर बोलताना त्यांनी अरुण जेटलींवर शरसंधान केले. 'भारतीय अर्थव्यवस्था सध्या ज्या दिशेनं चाललीय, ते पाहता आयकर विभाग बंद करायला हवा आणि सर्व करदात्यांना रस्तेबांधणीसारख्या कामाला जुंपायला हवं,' असं ते म्हणाले.

'सर्जिकल स्ट्राइक'चा राजकीय फायदा उठवण्यात गैर काहीच नाही. काँग्रेस १९७१च्या युद्धाचं राजकारण करू शकते, तर भाजप का नाही? स्वत:च्या कामाचं श्रेय घेण्याचा अधिकार प्रत्येक सरकारला आहे, 'सर्जिकल स्ट्राइक'ही त्याला अपवाद नाही, असं सांगतानाच, 'यूपीच्या निवडणुकीत आम्ही हा मुद्दा वापरणारच,' असं त्यांनी सांगितलं.

'केवळ विकासाच्या मुद्द्यावर कोणताही पक्ष निवडणुका जिंकू शकत नाही. पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रचंड विकासकामं केली होती, पण त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनीही २००४ची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली, पण त्यांनाही हार पत्करावी लागली. त्यामुळं उत्तर प्रदेशात भाजप विकासाचाच मुद्दा चालवणार असेल तर ते चुकीचं ठरेल. विकासाबरोबरच ठराविक मुदतीत राम मंदिर बांधण्याचं आश्वासन दिलं आणि लोकांमध्ये तसा विश्वास निर्माण केला तर यूपीत सत्तेत येण्याची संधी भाजपला आहे,' असं स्वामी यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज