लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून सत्तेत परतण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला आहे. आज (गुरुवारी) त्यांनी लखनऊमध्ये सायकल यात्रेला सुरुवात केली. या दरम्यान, अखिलेश यांनी मोठा दावा केलाय. आतापर्यंत आम्ही ३५० जागा म्हणत होतो, आता मात्र अशी स्थिती आहे की आम्हाला ४०० जागा मिळू शकतात, असं म्हणत एकहाती सत्ता हस्तगत करण्याची आकांक्षा अखिलेश यादव यांनी व्यक्त केलीय.
याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधलाय. यावेळी भाजपला उमेदवार मिळणंही कठीण होणार आहे. भाजप सध्या गुन्हेगारांच्या जवळ पोहचलेत. बदल हाच सायकल यात्रेचा उद्देश्य आहे. भाजप सरकारच्या फोलपणामुळे प्रत्येक वर्ग हैराण आहे. जी आश्वासनं दिली तीदेखील भाजपला पूर्ण करता आली नाहीत, असं अखिलेश यांनी म्हटलंय.
भाजपच्या घोषणापत्रात २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आज उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याला हे जाणून घ्यायचंय की, काळ्या कायद्यानंतर बंद झालेल्या बाजारानंतर त्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार आहे? आजदेखील शेतकऱ्यांच्या उसाची थकबाकी सरकारकडे आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या समाजवादी पक्षानं आपल्या पक्षाचे नेते जनेश्वर मिश्र यांच्या जयंतीचं निमित्त साधत पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केलंय. जनसमस्यांबद्दल नागरिकांत जागरुकता निर्माण करण्यासाठी पक्षाकडून ७५ जिल्ह्यांत सायकल यात्रा काढली गेलीय. आगामी निवडणुकीपर्यंत अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम पक्षाकडून आयोजित केले जातील, असंही अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलंय.
याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधलाय. यावेळी भाजपला उमेदवार मिळणंही कठीण होणार आहे. भाजप सध्या गुन्हेगारांच्या जवळ पोहचलेत. बदल हाच सायकल यात्रेचा उद्देश्य आहे. भाजप सरकारच्या फोलपणामुळे प्रत्येक वर्ग हैराण आहे. जी आश्वासनं दिली तीदेखील भाजपला पूर्ण करता आली नाहीत, असं अखिलेश यांनी म्हटलंय.
भाजपच्या घोषणापत्रात २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आज उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याला हे जाणून घ्यायचंय की, काळ्या कायद्यानंतर बंद झालेल्या बाजारानंतर त्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार आहे? आजदेखील शेतकऱ्यांच्या उसाची थकबाकी सरकारकडे आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या समाजवादी पक्षानं आपल्या पक्षाचे नेते जनेश्वर मिश्र यांच्या जयंतीचं निमित्त साधत पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केलंय. जनसमस्यांबद्दल नागरिकांत जागरुकता निर्माण करण्यासाठी पक्षाकडून ७५ जिल्ह्यांत सायकल यात्रा काढली गेलीय. आगामी निवडणुकीपर्यंत अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम पक्षाकडून आयोजित केले जातील, असंही अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलंय.