अ‍ॅपशहर

तीन बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक

उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तीन बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक केली असून, अन्सरुल्लाह बांगला टीम (एबीटी) या इस्लामी कट्टरवादी गटाशी त्यांचा संबंध असल्याचा संशय आहे.

Maharashtra Times 15 Sep 2017, 2:34 am
लखनऊ :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम up ats nabs three bangladeshi youths on suspicion of terror links
तीन बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक


उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तीन बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक केली असून, अन्सरुल्लाह बांगला टीम (एबीटी) या इस्लामी कट्टरवादी गटाशी त्यांचा संबंध असल्याचा संशय आहे.

मोहम्मद इम्रान, रज्जुद्दीन आणि मोहम्मद फिरदोस अशी या तिघांची नावे असून तिघेही एकमेकांचे भाऊ आहेत. बुधवारी संध्याकाळी लखनऊ स्थानकात हावडा-अमृतसर एक्स्प्रेसमध्ये शिरण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. आपण बांगलादेशचे नागरिक असल्याचे त्यांनी कबूल केले असून, त्यांच्याकडे बनावट आधारकार्डेही सापडली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ‘एबीटी’शी संबंधित असलेल्या अब्दुल्लाह या दहशतवाद्याला ६ ऑगस्ट रोजी ‘एटीएस’ने अटक केल्यानंतर या तिघांची नावे पुढे आली होती. तेव्हापासून ‘एटीएस’ त्यांच्या मागावर होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज