अ‍ॅपशहर

हादऱ्यांनंतर भाजप सावध! यूपीत मंत्री, आमदारांच्या राजीनाम्यांनंतर रणनीतीत केला 'हा' मोठा बदल

उत्तर प्रदेशात निवडणुकीची घोषणा होताच काही दिवसांत भाजपला मोठे हादरे बसले. तीन मोठे मंत्री आणि आमदार असे मिळून जवळपास १४ जणांनी भाजपला रामराम केला. यामुळे भाजपला आता आपली निवडणूक रणनीती बदलावी लागली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2022, 5:44 pm
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर असताना सत्ताधारी भाजपने आपली जागावाटपाची रणनीती सुधारण्यात व्यग्र आहे. आता आघाडीतील मित्रपक्ष आणि विद्यमान आमदारांबाबत पूर्वीपेक्षा अधिक उदार धोरण अवलंबले जात आहे. विधानसभेच्या ४०३ जागांपैकी १०७ जागांसाठी पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर इतर जागांसाठी विचारविनिमय सुरू आहे, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. यूपीमध्ये ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १० फेब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्चला निकाल लागणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम up election update bjp changes poll strategy after ministers and mlas resign
हादऱ्यांनंतर भाजप सावध! यूपीत मंत्री, आमदारांच्या राजीनाम्यांनंतर रणनीतीत केला मोठा बदल


विद्यमान १०० ते १५० आमदारांची तिकिटे कापण्याच्या (उमेदवारी न देण्याचा ) विचारात भाजप होता. पण माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वाखाली आणखी दोन मंत्री आणि काही आमदारांनी मुख्य प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. भाजपकडून ५० हून अधिक आमदारांची तिकिटे कापण्याची (उमेदवारी नाकारण्याची ) शक्यता कमी आहे. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात अँटी-इन्कम्बन्सी (सत्ताविरोधी लाट) हाताळण्यासाठी व्यापक बदल करण्यावर भर देण्यात आला होता. पण आता मित्रपक्ष संजय निषाद यांचा निषाद पक्ष आणि अपना दल यांनाही सध्याच्या तुलनेत मोठा वाटा मिळू शकतो, अशा चर्चा आहे. पण भाजप यापैकी प्रत्येकाला जास्तीत जास्त १५ जागांपर्यंत मर्यादित ठेवेल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

punjab elections : पंजाबमध्ये 'आप'ची मोठी घोषणा, दिला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवाराचा 'मान'

जागांच्या वाटपात जातीय समीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि सध्याच्या परिस्थितीत अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याबाबत पक्ष जागरूक आहे. सीएम योगी आदित्यनाथ आणि डेप्युटी सीएम केशव प्रसाद मौर्य यांची नावे आधीच उमेदवार म्हणून घोषित करण्यात आली आहेत. आता दिनेश शर्मा आणि स्वतंत्र देव सिंह यांसारखे दिग्गज नेते निवडणूक लढवणार की नाही? यावर चर्चा होत आहे. भाजपने पश्चिम यूपीमध्येही काही जागा रिक्त ठेवल्या आहेत. ज्यामुळे अन्य पक्षाशी युती होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

Rakesh Tikait: राकेश टिकैत यांचा पाठिंबा कोणत्या पक्षाला?; अखेर भूमिका केली स्पष्ट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज