लखनऊ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या रणसंग्रमात उतरण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय. यामुळे, विरोधकांसोबत भाजपच्या गोटात खळबळ उडालीय. भाजपसोबत मिळून आपण बसपाच्या जागा खेचून घेऊ, असा दावा रामदास आठवले यांनी केलाय. यासाठी त्यांनी भाजपकडे १० - १२ जागांची मागणी केलीय. जागा वाटपासंदर्भात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आपण संवाद साधत असल्याचंही आठवले यांनी म्हटलंय. (RPI may contest with BJP in UP Assembly Elections 2022)
आरपीआयची बहुजन कल्याण यात्रा
दुसरीकडे, उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी आरपीआय २६ सप्टेंबरपासून सहरनपूर जिल्ह्यातून बहुजन कल्याण यात्रेची सुरुवात करणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या फेरीनंतर या यात्रेची समाप्ती १८ डिसेंबर रोजी लखनऊमध्ये रमाबाई आंबेडकर परिसरात होईल, अशी घोषणा रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केलीय.
'आरपीआय हा एनडीएचा सहकारी पक्ष'
आरपीआय हा एनडीएचा सहकारी पक्ष आहे. या नात्यानं पक्षाकडून राज्यात भाजपसोबत निवडणुकीत उभं राहण्याची तयारी सुरू आहे, असंही आठवले यांनी यावेळी म्हटलंय. भाजपसोबत मिळून आपण मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या मतांना सुरुंग लावणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
यावेळी, त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधलाय. विधानसभा निवडणुकीत सपाकडून ४०० जागा जिंकण्याचा दावा करण्यात येतोय. मात्र चुकीनं त्यांनी एक शून्य वाढवून सांगितला आहे. आगामी निवडणुकीत ४० जागांवरही विजय मिळवणं सपासाठी कठीण असल्याचं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय. राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार स्थापन होणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
एनडीएत जागा वाटपाची ओढाताण
निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपसहीत इतर विरोधी पक्षांत जागा वाटपासाठी ओढाताण सुरू झालीय. एनडीएचे घटकपक्षही जागांकडे आशाळभूत नजर लावून बसलेत. याआधी बिहारमध्ये एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूनंही भाजपकडे जागांची मागणी केलीय. पुरेशा जागा दिल्या गेल्या नाहीत तर उत्तर प्रदेशातील चार जागा आपल्या पक्षानं निश्चित केल्या असल्याचंही जेडीयूनं म्हटलंय. या जागांवरून स्वतंत्ररित्या आपले उमेदवार उभं करण्याची धमकीच जेडीयूनं राज्यातील सत्ताधारी भाजपला दिलीय.
संजय निषाद यांची ७० जागांची मागणी तसंच उत्तर प्रदेशात संजय निषाद यांचा पक्ष भाजपचा सर्वात मोठा सहकारी मानला जातो. परंतु, काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी निषाद यांनी असंतोष जाहीर केला होता. आमच्या सहकार्याशिवाय कुणीही यूतीची सत्ता हस्तगत करू शकत नाही, असा दावाही त्यांनी केलाय. उत्तर प्रदेशातील ७० जागांवर निवडणूक लढवण्याची आशा संजय निषाद यांनी व्यक्त केलीय. परंतु, यासंदर्भात अद्याप भाजपकडून सहमती दर्शवण्यात आलेली नाही.
आरपीआयची बहुजन कल्याण यात्रा
दुसरीकडे, उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी आरपीआय २६ सप्टेंबरपासून सहरनपूर जिल्ह्यातून बहुजन कल्याण यात्रेची सुरुवात करणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या फेरीनंतर या यात्रेची समाप्ती १८ डिसेंबर रोजी लखनऊमध्ये रमाबाई आंबेडकर परिसरात होईल, अशी घोषणा रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केलीय.
'आरपीआय हा एनडीएचा सहकारी पक्ष'
आरपीआय हा एनडीएचा सहकारी पक्ष आहे. या नात्यानं पक्षाकडून राज्यात भाजपसोबत निवडणुकीत उभं राहण्याची तयारी सुरू आहे, असंही आठवले यांनी यावेळी म्हटलंय. भाजपसोबत मिळून आपण मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या मतांना सुरुंग लावणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
यावेळी, त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही निशाणा साधलाय. विधानसभा निवडणुकीत सपाकडून ४०० जागा जिंकण्याचा दावा करण्यात येतोय. मात्र चुकीनं त्यांनी एक शून्य वाढवून सांगितला आहे. आगामी निवडणुकीत ४० जागांवरही विजय मिळवणं सपासाठी कठीण असल्याचं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय. राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार स्थापन होणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
एनडीएत जागा वाटपाची ओढाताण
निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपसहीत इतर विरोधी पक्षांत जागा वाटपासाठी ओढाताण सुरू झालीय. एनडीएचे घटकपक्षही जागांकडे आशाळभूत नजर लावून बसलेत. याआधी बिहारमध्ये एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूनंही भाजपकडे जागांची मागणी केलीय. पुरेशा जागा दिल्या गेल्या नाहीत तर उत्तर प्रदेशातील चार जागा आपल्या पक्षानं निश्चित केल्या असल्याचंही जेडीयूनं म्हटलंय. या जागांवरून स्वतंत्ररित्या आपले उमेदवार उभं करण्याची धमकीच जेडीयूनं राज्यातील सत्ताधारी भाजपला दिलीय.
संजय निषाद यांची ७० जागांची मागणी