अ‍ॅपशहर

CAA अंमलबजावणी करणारे उत्तर प्रदेश पहिले राज्य

सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.

Authored bySubhash Mishra | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2022, 9:16 am
लखनऊः सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yogi adityanath
CAA अंमलबजावणी करणारे उत्तर प्रदेश पहिले राज्य


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथून आलेल्या सर्व अल्पसंख्यक निर्वासितांची (हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि पारसी) ओळख पटवण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार त्यांचे नागरिकत्व निश्चित केले जाणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश राज्यात अवैध पद्धतीने राहणाऱ्या लोकांचा डेटा तयार होणार आहे.

केरळमधील 'या' मशिदीत घुमणार वैदिक मंत्र!

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकत्व कायद्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या तीन देशांतून आलेल्या आणि दशकापासून राज्यात वास्तव्य करत असलेल्या नागरिकांची ओळख पटवण्यास सांगण्यात आले आहे. अफगाणिस्तानातून राज्यात वास्तव्य करण्यास आलेल्या लोकांची संख्या कमी आहे. मात्र, बांगलादेश आणि पाकिस्तानातून शोषण झाल्यानंतर निर्वासित असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. असे अल्पसंख्यक नागरिक अनेक दशकांपासून उत्तर प्रदेशात वास्तव्य करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

‘सीएए’विरोधात हैदराबादमध्ये मोर्चा

सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्याच्या दिशेने पावले उचलणारे उत्तर प्रदेश पहिले राज्य आहे. अन्य देशांतून भारतात आलेल्या अल्पसंख्यक निर्वासितांचे नागरिकत्व निश्चित करणे, हा यामागील उद्देश आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेले बहुसंख्य लोकं लखनऊ, रामपूर, शाहजहांपूर, नोएडा आणि गाझियाबाद या ठिकाणी वसले आहेत.

काश्मीर, शिमला, मनालीमध्ये हिमवृष्टी

प्रथमच अशा प्रकारची यादी तयार करण्यात येत आहे. नव्या कायद्यातील तरतुदींनुसार या लोकांना नागरिकत्व दिले जाणार आहे, असे अवस्थी यांनी नमूद केले. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांतून आलेल्या मुस्लिमांच्या संख्येची माहिती राज्य सरकारकडून केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे.

CAA: राहुल-प्रियांकांनी दंगली घडवल्या- शहा

दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल आणि प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करून दंगली घडवल्या, असा गंभीर आरोपही शहा यांनी यावेळी केला. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना शहा बोलत होते.
लेखकाबद्दल
Subhash Mishra

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज