अ‍ॅपशहर

दिल्लीने शेजाऱ्यांची चिंता वाढवली; सर्व सीमा सील

राजधानी दिल्लीत एका दिवसातली सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. दिल्लीत गुरुवारी एकाच दिवसात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण समोर आले. परिणामी दिल्लीच्या शेजारचे राज्यही धास्तावले आहेत. दिल्लीतून आपल्या शहरांमध्ये करोना येऊ नये यासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणा काळजी घेत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2020, 3:35 pm
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीने शेजारच्या राज्यांची चिंता वाढवली आहे. कारण, दिल्लीत सध्या १७ हजार ३८६ करोनाबाधित आहेत, तर ३९८ जणांचा मृत्यू झाला आहे. भीती एवढी वाढली आहे की, शेजारच्या राज्यांनी दिल्लीसाठी दरवाजे बंद केले आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेश सीमा सील करण्यात आली आहे. दिल्लीमुळे नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद आणि गुडगावमध्ये करोनाचा प्रसार वाढेल, अशी भीती या दोन राज्यांना आहे. बॉर्डर सील झाल्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये काम करणाऱ्या कामगारांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. नोएडा आणि गाझियाबादनंतर शुक्रवारी बदरपूर आणि गुडगाव सीमेवरही मोठी कोंडी झाली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम up haryana sealed delhi border amid rising positive cases in delhi
दिल्लीने शेजाऱ्यांची चिंता वाढवली; सर्व सीमा सील


राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासात १०२४ नवे रुग्ण सापडले आहेत, जो एका दिवसातील विक्रमी आकडा आहे. सर्वाधिक बाधितांच्या यादीत दिल्ली सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीने गुजरातलाही मागे टाकलं आहे. दिल्लीत २५ मे रोजी ६३५, २६ मे रोजी ४१२, २७ मे रोजी ७९२ आणि २८ मे रोजी १०२४ नवे रुग्ण सापडले.

मोदी-शाह यांच्यात मंथन; १ जूनपासून देश पुन्हा खुला होणार?

दिल्लीत मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच करोनाचा प्रसारही मोठ्या प्रमाणात वाढला. मे महिन्यात पहिल्यांदाच दिल्लीत १९ मे रोजी ५०० रुग्ण सापडले. त्यानंतर सरासरी दररोज मोठ्या प्रमाणात आकडा वाढत आहे. १९ मे रोजी ५००, २० मे रोजी ५३४, २१ मे रोजी ५७१ आणि २२ मे रोजी ६६० नवे रुग्ण सापडले.

देशातील रुग्णसंख्येतही मोठी वाढ

देशभरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे एकूण ७,४६६ नवे रुग्ण आढळले आहेत. ही एका दिवसात झालेली आतार्यंतची सर्वाधिक वाढ आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये एकूण १७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मजुरांना त्यांच्या घराजवळ नोकऱ्या द्या: मायावतींची मागणी

आतापर्यंत देशभरात एकूण ४ हजार ७०६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली असून ही दिलासादायक बाब आहे. गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ४ हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे ७१ हजार १०६. तर देशभरात एकूण सक्रिय करोनाबाधित रुग्णांची संख्या आहे सुमारे ९० हजार.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज