अ‍ॅपशहर

'गुजरातचे जवान शहीद का होत नाहीत?'

'देशाच्या सीमेवर इतर राज्यांतील जवानांप्रमाणे गुजरातचे जवान शहीद का होत नाहीत?', असा प्रश्न करून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यावरून, अखिलेश यांच्यावर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे.

Maharashtra Times 10 May 2017, 8:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम up mp bihar and south india have given india many martyrs gujrat has not given any says akhilesh yadav
'गुजरातचे जवान शहीद का होत नाहीत?'


'देशाच्या सीमेवर इतर राज्यांतील जवानांप्रमाणे गुजरातचे जवान शहीद का होत नाहीत?', असा प्रश्न करून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यावरून, अखिलेश यांच्यावर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे.

'उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण भारतासह देशाच्या विविध भागातील जवान दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेत. पण, गुजरातचा कुणी जवान शहीद झाला असेल तर सांगा', असा सवाल अखिलेश यांनी केला. अखिलेश यांनी या विधानातून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

काश्मीर खोरं गेल्या काही महिन्यांपासून धुमसतंय. सीमेवरही तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत आणि दहशतवादी क्रूरतेचा कळस गाठताहेत. देशाच्या रक्षणासाठी जवान शहीद होत आहेत. आज सकाळीच शोपियांमध्ये लष्करी अधिकारी उमर फैयाज यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला. दहशतवाद्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केली. या घटनांनी देशात संतापाची लाट उसळली असतानाच जवानांबाबत वादग्रस्त विधान करून अखिलेश अडचणीत आलेत.

अखिलेश यांचं मानसिक संतुलन बिघडलंय!

अखिलेश यादव यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. खरं तर पराभवानंतर आत्मचिंतन केलं जातं मात्र समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात सपाटून मार खाल्ल्याने अखिलेश हताश झाले आहेत. त्यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यातूनच ते राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यावर बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत, असे नक्वी म्हणाले.

अखिलेश यांचं विधान असंवेदनशील: काँग्रेस

काँग्रेस प्रवक्ते अजय कुमार यांनीही अखिलेश यांच्या वक्तव्याशी काँग्रेस सहमत नसल्याचे सांगितले. जवान पूर्ण देशाचा असतो. त्याला कोणत्याही राज्याशी जोडता येणार नाही. अखिलेश यांचं विधान चुकीचं आणि असंवेदनशील आहे. या विधानाबद्दल माफी मागायची की नाही, हे आता त्यांनीच ठरवायचे आहे, असे अजय कुमार म्हणाले.

बाबा रामदेव यांची टीका

योगगुरू बाबा रामदेव यांनीही अखिलेश यांच्यावर टीका केली. राजकीय पोळी शेकण्यासाठीच अखिलेश यांनी हे विधान केले आहे, असे ते म्हणाले तर संकुचित मानसिकतेतून अखिलेश यांनी हे विधान केल्याचे भाजप खासदार आर. के. सिंह म्हणाले. अखिलेश यांनी देशाची माफी मागायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

UP, Madhya Pradesh, Dakshin Bharat har jagah se shaheed huye hain, Gujarat ka koi jawan shaheed hua ho toh batao: Akhilesh Yadav pic.twitter.com/1eN85HemJh — ANI UP (@ANINewsUP) May 10, 2017
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज