अ‍ॅपशहर

पत्रकाराच्या अंगावर सॅनिटायझर टाकून जिवंत जाळलं, तिघांना अटक

Journalist Burnt Alive : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील केवलारी गावात एका पत्रकाराला आणि त्याच्या मित्राला जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडलीय. पोलिसांच्या तपासात या हत्येमागे दोन उद्देश असल्याचं समोर आलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2020, 1:31 pm
लखनऊ : उत्तर प्रदेशातील क्रूर गुन्ह्यांत दिवसेंदिवस भर पडत चालल्याचं ढळढळीतपणे समोर येतंय. नुकतंच एका पत्रकाराला आणि त्याच्या मित्राला पत्रकाराच्याच घरात जिवंत जाळण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आलीय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पत्रकाराच्या अंगावर सॅनिटायझर टाकून जिवंत जाळलं
पत्रकाराच्या अंगावर सॅनिटायझर टाकून जिवंत जाळलं (प्रातिनिधिक फोटो)


उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी लखनऊपासून जवळपास १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या बलरामपूर जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी एका पत्रकाराला जिवंत जाळण्यात आलं. ३७ वर्षीय पत्रकार आणि त्याच्या मित्राची गावाच्या अंगावर सॅनिटायझर टाकून त्यांना जिवंत पेटवून देण्यात आलं होतं. या हत्या प्रकरणात दोन उद्देश पोलीस तपासात समोर आले.

पत्रकार राकेश सिंह निर्भिक हे लखनऊ स्थित एका वृत्तपत्रासाठी काम करत होते. २७ नोव्हेंबर रोजी राकेश आणि त्यांचा ३४ वर्षीय मित्र पिंटू यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बलरामपूर जिल्ह्यातील केवलारी गावातील एका घरात सापडला होता. पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच पिंटू याचा मृत्यू झाला होता. परंतु, वेदनेनं विव्हळत असलेल्या राकेशला पोलिसांनी ताबडतोब रुग्णालयात हलवलं. रुग्णालयात पोहचल्यानंतर काही तासांतच राकेश यांनीही प्राण सोडले.

मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात पत्रकार असलेल्या राकेश यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती पोलिसांना दिली. स्थानिक सरपंच आणि त्यांच्या मुलानं केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लिहिल्यानं हल्ला करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. बलरामपूरचे पोलिस अधीक्षक देवरंजन वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अनेकांशी संपर्क साधल्यानंतर खासगी शत्रुत्वाचाही मुद्दा समोर आला.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सरपंचाचा मुलगा रिंकू मिश्रा यानं अल्कोहोलयुक्त हॅन्ड सॅनिटायझर अंगावर टाकून राकेश आणि त्यांचा मित्र पिंटू यांना जिवंत पेटवून दिलं.

वाचा : अखेर सरकार झुकलं, आजच शेतकऱ्यांशी बिनशर्त चर्चेसाठी तयार
वाचा : Explainer : पित्याकडूनच 'देशद्रोहा'चा आरोप; कोण आहे शेहला रशीद?


हत्येचे दोन उद्देश

पत्रकार राकेश सिंह निर्भिक यांनी सरपंच आणि त्यांच्या मुलाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लिहिल होतं. दुसरीकडे, राकेश यांचा मित्र पिंटू यानं आपली एक गाडी आरोपी ललित मिश्रा याला विकली होती. परंतु, त्याच्या पैशांवरून वाद सुरू होता. ललित आणि पिंटू यांच्यात एका बिअर बारमध्ये हाणामारीही झाली होती. यानंतर पिंटू राकेश यांच्या घरी केला.

तर दुसरीकडे आरोपी ललितनं आणखीन एक आरोपी अकरम याची मदत घेतली. या दिवशी आरोपी रिंकूनं पत्रकार राकेशला अनेकदा फोन केले. त्यानंतर रिंकू राकेशच्या घरी दाखल झाला.

रिंकूनं पत्रकार आणि त्याचा मित्र पिंटूला दारू पाजली. त्यानंतर अकरम आणि ललित हे दोघेही राकेशच्या घरी दाखल झाले. त्यानंतर राकेशच्या घराचा दरवाजा बंद करण्यात आला. रिंकू, ललित आणि अकरम यांनी पत्रकार आणि त्याच्या मित्रावर सॅनिटायझर टाकून त्यांना घरातच जिवंत पेटवून दिलं.

वाचा : शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
वाचा : आरटी-पीसीआर चाचणी ८०० रुपयांत करा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज