अ‍ॅपशहर

congress : काँग्रेसमध्ये 'तांडव'? जम्मूत आज 'नाराज' नेत्यांची बैठक, पक्ष नेतृत्वाला देणार कडक संदेश!

काँग्रेसमधील कलह पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. आता नाराज नेत्यांची जम्मूमध्ये आज बैठक होत असल्याचं सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे या बैठकीतून पक्ष नेतृत्वाला कडक संदेश दिला जाणार असं बोललं जातंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2021, 4:56 am
नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर-दक्षिण भारतीयांबद्दल केलेल्या टीपणीवरून राजकारण रंगलं आहे. आता पक्षाचे उत्तर भारतातील काही ज्येष्ठ नेतेही यावर नाराज ( upset congress leaders ) आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांची जम्मूत आज बैठक होत आहे. हे नेते पक्ष नेतृत्वाला आणि गांधी घराणाऱ्याला कठोर संदेश ( rahul gandhi ) देऊ शकतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ghulam Nabi Azad
काँग्रेसमध्ये 'तांडव'? जम्मूत आज 'नाराज' नेत्यांची बैठक, पक्ष नेतृत्वाला देणार कडक संदेश!


जम्मूमध्ये शनिवारी काँग्रेसच्या जी २३ गटाची बैठक होत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी ही बैठक होण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल, आनंद शर्मा, राज बब्बर हे रात्रीच दाखल झाले आहेत. इतर काही नेते सकाळी येण्याची शक्यता आहे. पक्षातल्या लोकशाही व्यवस्थेवर हे नेते चर्चा करतील, अशी शक्यता आहे.

निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज तामिळनाडूच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दरम्यान काँग्रेसचे २३ नेते जम्मूमध्ये आपलं शक्तिप्रदर्शन करतील. जम्मूमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा, कपिल सिब्बल, राज बब्बर, विवेक तन्खा आणि गुलाम नबी आझाद हे एका कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात मनीष तिवारीही सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

मच्छिमारांसोबत राहुल गांधींची समुद्रात उडी, मासेही पकडले

'गोडसे भक्ता'चा काँग्रेसमध्ये प्रवेश, माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

'राहुल गांधींना स्पष्ट संदेश...'

या बैठकीतून राहुल गांधींसाठी एक संदेश आहे. उत्तर आणि दक्षिण भारत एक आहे, हे आम्हाला देशाला दाखवायचे आहे. काँग्रेसमध्ये सध्या जे काही घडतंय ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत झालेल्या कराराचं स्पष्ट उल्लंघन आहे. आतापर्यंत पक्षात सुधारणा किंवा निवडणुका घेण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीएत, असं यातील काही नेत्यांनी सांगितल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

'उत्तर-दक्षिण' वक्तव्यावरून राहुल गांधी वादात; कपिल सिब्बलांनी दिला सल्ला, म्हणाले...

'गुलाम नबी आझाद यांचा सन्मान केला नाही'

गुलाम नबी आझाद यांना पक्षाकडून जी वागणूक दिली त्यानेही काँग्रेसचे नेते दुखावले आहेत. गुलाम नबी आझाद नुकतेच राज्यसभेमधून निवृत्त झाले आहेत. इतर पक्ष आझाद यांना राज्यसभेची जागा देण्यास तयार होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. पण आमच्या पक्षाने त्यांचा कुठलाही सन्मान केला नाही. त्या उलट रॉबर्ट वाड्रांचा खटला लढणार्‍या वकीलाला राज्यसभेची जागा दिली गेली, असं सूत्रांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज