अ‍ॅपशहर

'उरी हल्ला ही काश्मीरमधील अत्याचाराची प्रतिक्रिया'

उरी हल्ल्यानंतर जगभरातून छी-थू होत असतानाही पाकिस्ताननं काश्मीरचं तुणतुणं वाजवणं सुरूच ठेवलं आहे. 'उरीतील दहशतवादी हल्ला हा काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांकडून होत असलेल्या अत्याचारावरील प्रतिक्रिया असू शकते,' असा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे.

Maharashtra Times 24 Sep 2016, 12:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uri attack could be reaction to situation in kashmir nawaz sharif
'उरी हल्ला ही काश्मीरमधील अत्याचाराची प्रतिक्रिया'


उरी हल्ल्यानंतर जगभरातून छी-थू होत असतानाही पाकिस्ताननं काश्मीरचं तुणतुणं वाजवणं सुरूच ठेवलं आहे. 'उरीतील दहशतवादी हल्ला हा काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांकडून होत असलेल्या अत्याचारावरील प्रतिक्रिया असू शकते,' असा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे.

उरीतील हल्ल्यानंतर भारतानं जगाच्या व्यासपीठावर पाकिस्तानची कोंडी केली आहे. पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावेही संयुक्त राष्ट्रसंघाकडे देण्याच्याही हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळं बिथरलेल्या नवाझ शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा रेटून जगाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. लंडन येथे पत्रकारांशी बोलताना शरीफ यांनी तीच 'री' ओढली. 'गेल्या काही दिवसांत भारतीय सुरक्षा दलाच्या अत्याचाराचे बळी ठरलेल्या काश्मिरी नागरिकांच्या जवळच्या लोकांनी उरीत हल्ला केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, भारत कोणत्याही चौकशी आणि पुराव्याशिवाय थेट पाकिस्तानला दोषी धरत आहे. हे वर्तन बेजबाबदारपणाचां आहे,' अशी मल्लिनाथीही शरीफ यांनी केली आहे.

'काश्मिरी नागिरकांवर भारत सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराबद्दल सगळं जग जाणतं. आतापर्यंत काश्मीरमध्ये १०८ लोक मारले गेले आहेत तर, १५०हून अधिक लोक जखमी झाले आहेत,' असा आरोपही शरीफ यांनी केला. 'भारतानं पाकिस्तानला दोष देण्याआधी काश्मीरमधील अत्याचारांकडे पाहावे. तेथील मृत्यूंची चौकशी करावी,' असा शहाजोगपणाचा सल्लाही शरीफ यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज