वृत्तसंस्था, उरी/दिल्ली
उरी हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी सीमेवरील विद्युत कुंपण ओलांडण्यासाठी शिडीचा वापर केला होता. या हल्ल्यामध्ये १९ भारतीय जवान मारले गेले होते. घुसखोरी नेमकी कुठून झाली, यासाठी लष्कराने केलेल्या चौकशीमध्ये ही बाब उघडकीस आली.
लष्करी सूत्रांनी सांगितले, की सालामाबाद नाला येथे दहशतवाद्यांनी शिडीचा वापर केला होता. या नाल्याच्या येथे कुंपण परिपूर्ण नाही. याचा फायदा घेऊन एका दहशतवाद्याने भारतामध्ये घुसखोरी केली आणि भारताच्या बाजूला असलेले कुंपण ओलांडण्यासाठी शिडीचा वापर केला. बाकीच्या तीन दहशतवाद्यांकडे त्यांच्या बाजूला शिडी होती. या दोन शिड्या पादचारी पुलासारख्या जोडल्या आणि दहशतवादी भारतामध्ये आले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि खाण्याचे पदार्थ होते. अशा पद्धतीने कुंपण ओलांडणे त्यांच्या जिवावर बेतणारे होते. दहशतवाद्यांनी भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर कुठलाही पुरावा राहू नये, म्हणून त्यांनी शिडी त्यांच्या दोन गाइडकडे (महंमद काबिर आवान आणि बशरत) परत केली. काबिर आणि बशरत या दोघांनी दहशतवाद्यांना ताबारेषेपर्यंत साथ दिली.
दहशतवादी भारतामध्ये कसे आले, त्यांनी कुठे आश्रय घेतला होता, या संदर्भात लष्कराची चौकशी अद्याप सुरू आहे. लष्करी तळाबाबत सविस्तर माहिती दहशतवाद्यांना होती. त्यामुळे दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी काही दिवस आधी भारतामध्ये आले असण्याची शक्यता आहे.
उरी हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी सीमेवरील विद्युत कुंपण ओलांडण्यासाठी शिडीचा वापर केला होता. या हल्ल्यामध्ये १९ भारतीय जवान मारले गेले होते. घुसखोरी नेमकी कुठून झाली, यासाठी लष्कराने केलेल्या चौकशीमध्ये ही बाब उघडकीस आली.
लष्करी सूत्रांनी सांगितले, की सालामाबाद नाला येथे दहशतवाद्यांनी शिडीचा वापर केला होता. या नाल्याच्या येथे कुंपण परिपूर्ण नाही. याचा फायदा घेऊन एका दहशतवाद्याने भारतामध्ये घुसखोरी केली आणि भारताच्या बाजूला असलेले कुंपण ओलांडण्यासाठी शिडीचा वापर केला. बाकीच्या तीन दहशतवाद्यांकडे त्यांच्या बाजूला शिडी होती. या दोन शिड्या पादचारी पुलासारख्या जोडल्या आणि दहशतवादी भारतामध्ये आले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि खाण्याचे पदार्थ होते. अशा पद्धतीने कुंपण ओलांडणे त्यांच्या जिवावर बेतणारे होते. दहशतवाद्यांनी भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर कुठलाही पुरावा राहू नये, म्हणून त्यांनी शिडी त्यांच्या दोन गाइडकडे (महंमद काबिर आवान आणि बशरत) परत केली. काबिर आणि बशरत या दोघांनी दहशतवाद्यांना ताबारेषेपर्यंत साथ दिली.
दहशतवादी भारतामध्ये कसे आले, त्यांनी कुठे आश्रय घेतला होता, या संदर्भात लष्कराची चौकशी अद्याप सुरू आहे. लष्करी तळाबाबत सविस्तर माहिती दहशतवाद्यांना होती. त्यामुळे दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी काही दिवस आधी भारतामध्ये आले असण्याची शक्यता आहे.