अ‍ॅपशहर

एका उंदरानं विमान रोखलं; प्रवासी २४ तास रखडले

एका उंदरामुळं वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री विमानतळावर एअर इंडियाचं विमान २४ तासांसाठी रोखण्यात आलं. शनिवारी रात्री विमानात उंदीर दिसल्यानं गोंधळ उडाला होता. त्यामुळं प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2020, 4:16 pm
वाराणसी: एका उंदरामुळं वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री विमानतळावर एअर इंडियाचं विमान २४ तासांसाठी रोखण्यात आलं. शनिवारी रात्री विमानात उंदीर दिसल्यानं गोंधळ उडाला होता. त्यामुळं प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं. उंदराचा शोध घेतला, पण तो काही सापडला नाही. अखेर सोमवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानानं देहरादूनकडे उड्डाण भरलं. या दरम्यान, विमानातील प्रवाशांना २४ तासांसाठी एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम air india


नियमानुसार, विमानात उंदीर असेल तर, विमानाचं उड्डाण रोखलं जातं. कारण उंदरानं विमानातील एखादी वायर कुरतडली तर, प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. विमानात उंदीर दिसल्यानं अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री विमानाचं उड्डाण रोखलं. २४ तास हे विमान थांबून ठेवलं होतं. त्यादरम्यान, कर्मचारी वर्ग उंदराचा शोध घेत होते. तर टेक्निशिअन विमानातील सर्व केबलची तपासणी करत होते.

सिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई: ट्रेनमधील चोरीच्या मोबाइलचं पुढे काय होतं?

विमानाच्या उड्डाणासाठी रोडेंट फ्री प्रमाणित असणं आवश्यक असतं. वाराणसी विमानतळावर उंदीर विमानात शिरला की, त्याआधीच तो विमानात होता याचं स्पष्टीकरण विमान कंपनीला देता आलं नाही. एअर इंडियाच्या विमानानं कोलकाता विमानतळावरून उड्डाण भरलं होतं. त्यानंतर ८५ मिनिटांनी ते वाराणसीला पोहोचले होते.

सोशल मीडियावर टीका

विमानाला २४ तास विलंब झाल्यानं प्रवाशी प्रचंड नाराज झाले होते. २५ फेब्रुवारीला विमानाला कोलकाता विमानतळावर सव्वा तास विलंब झाला. नंतर वाराणसी विमानतळावर उंदीर शिरल्यानं विमानातून उतरवण्यात आलं. विमान कधी उड्डाण भरेल हे २४ तासांनंतरही आम्हाला माहीत नव्हते, असं ट्विट एका प्रवाशानं केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज