अ‍ॅपशहर

मायावतींचा पराभव चुकीच्या धोरणांमुळेच: जेटली

उत्तर प्रदेशातील पराभवानंतर थयथयाट करणाऱ्या बहूजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांना भाजप नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी चांगलेच सुनावले आहे. मायावती यांचा पराभव त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच झाला असून त्यांनी त्याचा स्विकार करायला हवा, अशा शब्दात जेटली यांनी मायावतींना सुनावले आहे. मतदान यंत्रात घोळ झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी फेटाळून लावला.

Maharashtra Times 12 Mar 2017, 10:37 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uttar pradesh election results 2017 mayawati lost because of wrong policies says arun jaitely
मायावतींचा पराभव चुकीच्या धोरणांमुळेच: जेटली


उत्तर प्रदेशातील पराभवानंतर थयथयाट करणाऱ्या बहूजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांना भाजप नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी चांगलेच सुनावले आहे. मायावती यांचा पराभव त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच झाला असून त्यांनी त्याचा स्विकार करायला हवा, अशा शब्दात जेटली यांनी मायावतींना सुनावले आहे. मतदान यंत्रात घोळ झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी फेटाळून लावला.

मतदान यंत्रात घोळ केल्यानेच भाजपला उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळाला असून इव्हिएम मशीनचं प्रत्येक मत भाजपा उमेदवारालाच जात होतं असा आरोप मायावती यांनी उत्तर प्रदेशातील पराभवानंतर केला होता. एकही मुस्लिम उमेदवार न देणाऱ्या भाजपला मुस्लिम मोहल्ल्यातून मते मिळालीच कशी? असा सवालही मायावती यांनी करत याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यावर बोलताना जेटली यांनी मायावतींच्या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं.

मायावतींनी असे आरोप करणे योग्य नाही. भारत हा लोकशाही असलेला सर्वात मोठा देश आहे. मायावतींचा पराभव हा त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे झाला असे जेटली म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय जनतेला पटला असून या निर्णयामुळे भाजपला फायदाच झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेत सत्तेचा दावेदार असलेल्या बसपला अवघ्या १९ जागा मिळाल्याने मायावती चांगल्याच भडकल्या होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज