नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांच्या 'लड़की हूं, लड़ सकती हूं' या घोषणेवर निशाणा साधताना राहुल गांधी यांना टीकेचं लक्ष्य केलंय. 'घर पर लड़का है, पर लड़ नहीं सकता' असं म्हणत स्मृती इराणी यांनी प्रियांका गांधींच्या घोषणेला प्रत्यूत्तर दिलंय. 'टाईम्स नाऊ समिट २०२१'मध्ये बोलताना स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर व्यंगात्मक टीका केलीय.
गेल्या महिन्यात काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकात ४० टक्के जागांवर महिला उमेदवारांना संधी देणार असल्याचं जाहीर केलं होते. यावेळी, 'लड़की हूं, लड़ सकती हूं' अशी घोषणा देत प्रियांका गांधींनी महिला उमेदवारांना आणि मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला होता.
प्रियांकांच्या या घोषणेचा उल्लेख करताना स्मृती इराणींनी 'याचा अर्थ हा आहे की घरात मुलगा आहे, पण लढू शकत नाही' (घर पर लड़का है, पर लड़ नहीं सकता) असा असल्याचं म्हणत त्यांनी राहुल गांधींना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. 'याचा अर्थ प्रियांका महिलांना ६० टक्के तिकीट देऊ इच्छित नाहीत, असाही होत असल्याचा' दावा इराणींनी केला.
'उत्तर प्रदेश निवडणुका विकासाच्या मुद्यावर लढवल्या जायला हव्यात' असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिलाय. 'मी असं म्हणत नाही की राजकारण आणि लोकशाहीसाठी लोकांनी प्रयत्न करू नये. जिंकणं आणि पराभूत होणं हा राजकारणाचा भाग आहे. मीदेखील २०१४ मध्ये पराभूत झाले होते. परंतु, प्रश्न हा आहे की लोकांना तुमच्या प्रयत्नांवर किती विश्वास आहे' असा प्रश्नही त्यांनी विरोधकांना विचारला.
गेल्या महिन्यात काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकात ४० टक्के जागांवर महिला उमेदवारांना संधी देणार असल्याचं जाहीर केलं होते. यावेळी, 'लड़की हूं, लड़ सकती हूं' अशी घोषणा देत प्रियांका गांधींनी महिला उमेदवारांना आणि मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला होता.
प्रियांकांच्या या घोषणेचा उल्लेख करताना स्मृती इराणींनी 'याचा अर्थ हा आहे की घरात मुलगा आहे, पण लढू शकत नाही' (घर पर लड़का है, पर लड़ नहीं सकता) असा असल्याचं म्हणत त्यांनी राहुल गांधींना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. 'याचा अर्थ प्रियांका महिलांना ६० टक्के तिकीट देऊ इच्छित नाहीत, असाही होत असल्याचा' दावा इराणींनी केला.
'उत्तर प्रदेश निवडणुका विकासाच्या मुद्यावर लढवल्या जायला हव्यात' असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिलाय. 'मी असं म्हणत नाही की राजकारण आणि लोकशाहीसाठी लोकांनी प्रयत्न करू नये. जिंकणं आणि पराभूत होणं हा राजकारणाचा भाग आहे. मीदेखील २०१४ मध्ये पराभूत झाले होते. परंतु, प्रश्न हा आहे की लोकांना तुमच्या प्रयत्नांवर किती विश्वास आहे' असा प्रश्नही त्यांनी विरोधकांना विचारला.