वरडेहराडून: उत्तराखंडमध्ये राजकीय भूकंप घडला असून पुष्करसिंह धामी सरकारमधील कॅबिनेट मंत्री हरकसिंह रावत यांनी आज तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्य म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत खटके उडाल्यानंतर तिथेच रावत यांनी राजीनामा देत निषेध नोंदवला. 'सरकारमध्ये असूनही एखाद्या भिकारी व्यक्तीसारखी माझी अवस्था करण्यात आली आहे. त्यामुळेच मंत्रिपद सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे', असे सांगत हरकसिंह रावत यांनी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. २०१६ मध्ये उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार पाडण्यात हरकसिंह यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याच हरकसिंह यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारविरुद्ध बंड पुकारल्याने उत्तराखंडच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. ( Harak Singh Rawat Resign Latest Breaking News ) वाचा: माझे हातपाय बांधून ठेवलेत!; रावत यांचा धमाका, थेट काँग्रेस हायकमांडवर...
कोटद्वार येथे मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी हरकसिंह रावत सातत्याने करत होते. अनेकदा मंत्रिमंडळ बैठकीत तसेच अन्य व्यासपीठांवर त्यांनी हा मुद्दा मांडला. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यात आज याच मुद्द्यावर मंत्रिमंडळ बैठकीत खटके उडाले आणि त्याचा निषेध करत तडकाफडकी राजीनाना देऊन हरकसिंह हे बैठकीतून निघून गेले. हरकसिंह यांनी राजीनाम्यानंतर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या मतदारसंघासाठी मेडिकल कॉलेज मागत होतो. गेली पाच वर्षे यासाठी झगडतो आहे. मात्र, सरकारमध्ये असूनही माझी मागणी मान्य केली जात नाही. माझी अवस्था भिकाऱ्यासारखी केली आहे, असे नमूद करत हरकसिंह यांनी संताप व्यक्त केला. यावेळी हरकसिंह यांना अश्रू अनावर झाले.
वाचा: ममतांचा गोव्यात धमाका; काँग्रेसचा उमेदवारच फोडला, आमदारकी सोडून...
दरम्यान, हरकसिंह यांचे समर्थक मानले जाणारे भाजप आमदार उमेश शर्मा यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. त्याआधी भाजपचे आणखी एक आमदार यशपाल आर्य यांनीही राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेसमध्ये परतणार?
हरकसिंह हे बंडखोर नेते म्हणून ओळखले जातात. २०१६ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते. त्यातूनच रावत यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर हरकसिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मंत्रिपद सोडल्यानंतर हरकसिंह काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून तसे झालेच तर हरीश रावत यांच्याशी त्यांना जुळवून घ्यावे लागणार आहे.
वाचा: मोठी बातमी: राजस्थानात भारत-पाक सीमेजवळ मिग-२१ विमान कोसळले
कोटद्वार येथे मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी हरकसिंह रावत सातत्याने करत होते. अनेकदा मंत्रिमंडळ बैठकीत तसेच अन्य व्यासपीठांवर त्यांनी हा मुद्दा मांडला. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यात आज याच मुद्द्यावर मंत्रिमंडळ बैठकीत खटके उडाले आणि त्याचा निषेध करत तडकाफडकी राजीनाना देऊन हरकसिंह हे बैठकीतून निघून गेले. हरकसिंह यांनी राजीनाम्यानंतर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या मतदारसंघासाठी मेडिकल कॉलेज मागत होतो. गेली पाच वर्षे यासाठी झगडतो आहे. मात्र, सरकारमध्ये असूनही माझी मागणी मान्य केली जात नाही. माझी अवस्था भिकाऱ्यासारखी केली आहे, असे नमूद करत हरकसिंह यांनी संताप व्यक्त केला. यावेळी हरकसिंह यांना अश्रू अनावर झाले.
वाचा: ममतांचा गोव्यात धमाका; काँग्रेसचा उमेदवारच फोडला, आमदारकी सोडून...
दरम्यान, हरकसिंह यांचे समर्थक मानले जाणारे भाजप आमदार उमेश शर्मा यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. त्याआधी भाजपचे आणखी एक आमदार यशपाल आर्य यांनीही राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेसमध्ये परतणार?
हरकसिंह हे बंडखोर नेते म्हणून ओळखले जातात. २०१६ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरुद्ध बंड पुकारले होते. त्यातूनच रावत यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर हरकसिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मंत्रिपद सोडल्यानंतर हरकसिंह काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून तसे झालेच तर हरीश रावत यांच्याशी त्यांना जुळवून घ्यावे लागणार आहे.
वाचा: मोठी बातमी: राजस्थानात भारत-पाक सीमेजवळ मिग-२१ विमान कोसळले