मडगाव : ओडिशा येथे दोन एक्स्प्रेस आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाल्यानंतर गेले अनेक दिवस उत्सुकता लागून राहिलेल्या वंदे भारत एक्सप्रेस चा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र हा उद्घाटन सोहळा पुन्हा केव्हा होणार किंवा ही वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांकरता नियमित कधी धावणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यासोबत लवकरच कोकण रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतरीत्या कळविण्यात येईल अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.
ओडिशा येथे झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातानंतर हा महत्त्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उद्घाटनाची जय्यत तयारी मडगाव रेल्वे स्थानकावर करण्यात आली होती. या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे गोवा येथे सायंकाळी उशिरा दाखल झाले होते. मात्र, ओडिशातील रेल्वेच्या भीषण अपघातामुळे हा वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द झाल्याने केंद्रीय रेल्वेमंत्रीही सायंकाळी उशिरा पुन्हा दिल्ली येथे रवाना झाले. त्यामुळे आता कदाचित वंदे भारत एक्सप्रेस कोणत्याही उद्घाटनाविना पाच जून पासून मुंबई येथून चालवली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
गेले अनेक दिवस प्रवाशांना ही उत्सुकता लावून राहिली होती. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याचा प्लॅनही अनेकांनी केला होता. मात्र, या सगळ्या वरच आता विरजण पडले आहे.
ओडिशा येथे झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातानंतर हा महत्त्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उद्घाटनाची जय्यत तयारी मडगाव रेल्वे स्थानकावर करण्यात आली होती. या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे गोवा येथे सायंकाळी उशिरा दाखल झाले होते. मात्र, ओडिशातील रेल्वेच्या भीषण अपघातामुळे हा वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द झाल्याने केंद्रीय रेल्वेमंत्रीही सायंकाळी उशिरा पुन्हा दिल्ली येथे रवाना झाले. त्यामुळे आता कदाचित वंदे भारत एक्सप्रेस कोणत्याही उद्घाटनाविना पाच जून पासून मुंबई येथून चालवली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
गेले अनेक दिवस प्रवाशांना ही उत्सुकता लावून राहिली होती. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याचा प्लॅनही अनेकांनी केला होता. मात्र, या सगळ्या वरच आता विरजण पडले आहे.