अ‍ॅपशहर

राहुल गांधींचा मंदसौर दौरा 'फोटो सेशन'साठी: नायडू

'मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन चिघळवून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असा आरोप करतानाच, 'राहुल गांधी यांचा मंदसौर दौरा हा निव्वळ स्टंट असून फोटोसेशनसाठी ते तिथं गेले होते,' अशी टीका केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

Maharashtra Times 8 Jun 2017, 3:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम venkaiah naidu congress instigating politicising mp farmers stir
राहुल गांधींचा मंदसौर दौरा 'फोटो सेशन'साठी: नायडू


'मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन चिघळवून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असा आरोप करतानाच, 'राहुल गांधी यांचा मंदसौर दौरा हा निव्वळ स्टंट असून फोटोसेशनसाठी ते तिथं गेले होते,' अशी टीका केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

राहुल गांधींच्या मंदसौर भेटीबाबत नायडू यांना विचारण्यात आलं असता त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. 'शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं भांडवल करून काँग्रेस राजकीय पोळी भाजू पाहात आहे. एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून त्यांनी हे करता कामा नये. त्यांनी परिस्थिती निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करायला हवं,' असं ते म्हणाले. शेतकऱ्यांवरील गोळीबाराप्रकरणी विरोधक मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. ही मागणीही नायडू यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. 'शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसनं दिग्विजय सिंह यांच्या राजवटीत २४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला का? त्यावेळी राहुल गांधी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना भेट दिली होती का?', असा सवालही केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज