अ‍ॅपशहर

शेतकरी पुत्र उपराष्ट्रपती झाला, नायडू भावूक

उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. 'एका शेतकऱ्याचा मुलगा देशाच्या दुसऱ्या मोठ्या घटनात्मक पदावर पोहोचला आहे. हा प्रवास अतिशय अद्भूत होता', असं नायडू म्हणाले.

Maharashtra Times 5 Aug 2017, 10:04 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम venkaiah naidu thanks pm modi and mps for support after elected new vice president
शेतकरी पुत्र उपराष्ट्रपती झाला, नायडू भावूक


उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. 'एका शेतकऱ्याचा मुलगा देशाच्या दुसऱ्या मोठ्या घटनात्मक पदावर पोहोचला आहे. हा प्रवास अतिशय अद्भूत होता', असं नायडू म्हणाले. 'आता आपण कुठल्या एका पक्षाचे नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा आपला प्रयत्न राहिल', असं नायडूंनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व खासदारांचे नायडू यांनी आभार मानले. अण्णा द्रमुकचे दोन्ही गट, वायएसआर काँग्रेस आणि टीआरएस, इंडियन नॅशनल लोकदल यांचे नाव घेत आपल्याला समर्थन दिल्याबद्दल नायडूंनी आभार व्यक्त केले.

'प्रामाणिकपणे काम करून राज्यसभेची प्रतिष्ठा जपेन. सभागृहातील सर्व पक्षांना सोबत घेऊन नियमानुसार काम करेन. सर्वांच्या आपेक्षांवर खरा उतरण्याचा प्रयत्न करेन', असं व्यंकय्या नायडू म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज