अ‍ॅपशहर

आता विश्व हिंदू परिषदेची 'पद्मावती'ला धमकी

चित्तोडच्या राणी पद्मावती यांच्यावर बनवल्या जाणाऱ्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' सिनेमातल्या कथित आक्षेपार्ह दृश्यांविरोधात राजपूतांच्या करणी सेनेनंतर आता विश्व हिंदू परिषदेने निर्मात्यांना धमकी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी करणी सेनेने जयपूर येथे 'पद्मावती' च्या शूटिंगदरम्यान सेटची नासधूस भन्साळींच्या कानशीलात लगावली होती.

Maharashtra Times 30 Jan 2017, 10:43 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vhp warns sanjay leela bhansali for padmavati
आता विश्व हिंदू परिषदेची 'पद्मावती'ला धमकी


चित्तोडच्या राणी पद्मावती यांच्यावर बनवल्या जाणाऱ्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' सिनेमातल्या कथित आक्षेपार्ह दृश्यांविरोधात राजपूतांच्या करणी सेनेनंतर आता विश्व हिंदू परिषदेने निर्मात्यांना धमकी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी करणी सेनेने जयपूर येथे 'पद्मावती' च्या शूटिंगदरम्यान सेटची नासधूस भन्साळींच्या कानशीलात लगावली होती.

सिनेमात काहीही आक्षेपार्ह असेल तर त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी विश्व हिंदू परिषदेने दिली आहे. परिषदेची महिला शाखा मातृशक्तीच्या प्रमुख मीनाक्षी पेशवे आणि दुर्गा वाहिनीच्या राष्ट्रीय संयोजक माला रावल यांनी एक संयुक्त निवेदन जाहीर केले आहे. त्यात म्हटले आहे की, इतिहासाच्या नावावर धंदा करणाऱ्या काही विदेशी आणि डाव्या तथाकथित इतिहासकारांच्या दुष्कृत्यांमुळे जर राजस्थानच्या गौरवशाली राजपूत परंपरेचा अपमान होत असेल तर तो सहन केला जाणार नाही. राणी पद्मावती अमर वीरांगणा होत्या. मुघल अत्याचारी अल्लाउद्दीन खिलजीपासून स्वत:चे शील वाचवत राणी पद्मावतींनी स्वत:ला जळत्या चितेत झोकून दिले होते. पैशांच्या लोभापायी आणि प्रसिद्धीच्या मोहापायी अशा महान महिलेला अत्यंत गलिच्छ पद्धतीने अल्लाउद्दिनची प्रेमिका म्हणून दाखवले जाणे हा भारतीय इतिहासाचा बलात्कार तर आहेच पण प्रत्येक भारतीय नारीच्या सन्मानाला लागलेला धक्का आहे.

मीनाक्षी पेशवे म्हणतात, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर कोणी हिंदू वीरांगणांना आपल्याच भूमीवर अपमानित करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.' संजय लीला भन्साळींनी याप्रकरणी देशातल्या महिलांची माफी मागावी असेही या निवेदनात म्हटले आहे.

भन्साळी यांनी मात्र या संपूर्ण प्रकणावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की त्यांच्या सिनेमात काहीही आपत्तीजनक नाही. आपल्या क्रूच्या सुरक्षेसाठी जयपूरमधील शूटिंग थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज