नवी दिल्ली:
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात 'वंदे मातरम्'वरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. 'वंदे मातरम्'च्या घोषणा देण्यात काय अडचण आहे. तुम्ही मातेला वंदन करणार नाही तर मग अफझल गुरुला करणार का, असा सवाल त्यांनी केला.
'वंदे मातरम्' याचा अर्थ मातृभूमीला नमन... मातेला वंदन करणे...मग काय समस्या आहे. मातेला वंदन करणार नाही तर मग काय अफझल गुरुला करणार का, असा सवाल नायडू यांनी 'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना केला. अनेक जण 'भारत माता की जय' म्हणतात. त्याचा संबंध केवळ फोटोतील देवतांशी येतो, असे नाही. ते देशातील सव्वाशे कोटी जनतेबाबत आहे. मग त्यांची जात, वर्ण, पंथ किंवा धर्म कोणताही असो. ते सर्वच भारतीय आहेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी १९९५ साली सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्त्वावर दिलेल्या निकालाचे उदाहरण दिले. 'हिंदू धर्म नाही तर एक जीवनपद्धती आहे. हिंदू धर्म संकुचित संकल्पना नसून भारताची संस्कृती आणि परंपरा आहे. आपली संस्कृती 'वसुधैव कुटुंबकम'ची शिकवण देते, याचाच अर्थ संपूर्ण विश्व एकच कुटुंब आहे, असा होतो,' असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अशोक सिंघल यांच्या कार्याचाही गौरव केला.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात 'वंदे मातरम्'वरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. 'वंदे मातरम्'च्या घोषणा देण्यात काय अडचण आहे. तुम्ही मातेला वंदन करणार नाही तर मग अफझल गुरुला करणार का, असा सवाल त्यांनी केला.
'वंदे मातरम्' याचा अर्थ मातृभूमीला नमन... मातेला वंदन करणे...मग काय समस्या आहे. मातेला वंदन करणार नाही तर मग काय अफझल गुरुला करणार का, असा सवाल नायडू यांनी 'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना केला. अनेक जण 'भारत माता की जय' म्हणतात. त्याचा संबंध केवळ फोटोतील देवतांशी येतो, असे नाही. ते देशातील सव्वाशे कोटी जनतेबाबत आहे. मग त्यांची जात, वर्ण, पंथ किंवा धर्म कोणताही असो. ते सर्वच भारतीय आहेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी १९९५ साली सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्त्वावर दिलेल्या निकालाचे उदाहरण दिले. 'हिंदू धर्म नाही तर एक जीवनपद्धती आहे. हिंदू धर्म संकुचित संकल्पना नसून भारताची संस्कृती आणि परंपरा आहे. आपली संस्कृती 'वसुधैव कुटुंबकम'ची शिकवण देते, याचाच अर्थ संपूर्ण विश्व एकच कुटुंब आहे, असा होतो,' असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अशोक सिंघल यांच्या कार्याचाही गौरव केला.