नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात संपूर्ण देशात शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या १२३ दिवसांपासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज अनोख्या पद्धतीनं होळीचा सण साजरा केला. दिल्ली उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर आंदोलनावर बसलेल्या शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या प्रतींचं दहन करून आणि गात-नाचत हा सण साजरा केला.
न्यूज एजन्सी एएनआयनं प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओत शेतकरी संगीताच्या तालावर नाचताना दिसत आहेत. 'सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि तीन कृषी कायदे मागे घ्यावेत. त्यामुळे आम्ही घरी जाऊ शकू' असं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी म्हटलंय.
रविवारी 'होलिका दहन' दरम्यान शेतकऱ्यांनी कुंडली सीमेवरील आंदोलनस्थळासहीत अनेक ठिकाणी कृषी कायद्यांच्या प्रतींचं दहन केलं. तसंच ३० मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चाच्या एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये आंदोलनाची पुढची रणनीती आखण्यात येणार आहे.
सलग गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहेत. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर ठाण मांडलंय. सोबतच देशातील वेगवेगळ्या भागांत किसान महापंचायतींचंही आयोजन करण्यात येतंय. गेल्या शुक्रवारी कृषी कायद्यांविरुद्ध भारत बंदचंही आवाहन करण्यात आलं होतं. या दरम्यान पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांत रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसल्याचं दिसलं.
उत्तर प्रदेशच्या गेटवर उकाड्यापासून वाचण्यासाठी व्यवस्था उभारण्यात आलीय. इथे ५० पंखे लावण्यात आले आहेत.
न्यूज एजन्सी एएनआयनं प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओत शेतकरी संगीताच्या तालावर नाचताना दिसत आहेत. 'सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि तीन कृषी कायदे मागे घ्यावेत. त्यामुळे आम्ही घरी जाऊ शकू' असं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी म्हटलंय.
रविवारी 'होलिका दहन' दरम्यान शेतकऱ्यांनी कुंडली सीमेवरील आंदोलनस्थळासहीत अनेक ठिकाणी कृषी कायद्यांच्या प्रतींचं दहन केलं. तसंच ३० मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चाच्या एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये आंदोलनाची पुढची रणनीती आखण्यात येणार आहे.
सलग गेल्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहेत. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर ठाण मांडलंय. सोबतच देशातील वेगवेगळ्या भागांत किसान महापंचायतींचंही आयोजन करण्यात येतंय. गेल्या शुक्रवारी कृषी कायद्यांविरुद्ध भारत बंदचंही आवाहन करण्यात आलं होतं. या दरम्यान पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांत रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसल्याचं दिसलं.
उत्तर प्रदेशच्या गेटवर उकाड्यापासून वाचण्यासाठी व्यवस्था उभारण्यात आलीय. इथे ५० पंखे लावण्यात आले आहेत.