अ‍ॅपशहर

वीरप्पनची मुलगी म्हणते, 'मोदींच्या प्रेरणेतून भाजपमध्ये आले'

अपहरण, हत्तींची शिकार आणि चंदन तस्करीसाठी कुख्यात असलेल्या वीरप्पनच्या मुलीने भाजपमध्ये प्रवेश केलाय. तामिळनाडूतील भाजप नेते मुरलीधर राव आणि पोन राधाकृष्णन यांच्यासह भाजपच्या इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तिने भाजपत प्रवेश केला. 'पतंप्रधान नरेंद्र मोदींनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांच्या प्रेरणेतून भाजपमध्ये प्रवेश केला', असं वीरप्पनची मुलगी विद्याराणीने सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2020, 6:08 pm
चेन्नईः अपहरण, हत्तींची शिकार आणि चंदन तस्करीसाठी कुख्यात असलेल्या वीरप्पनच्या मुलीने भाजपमध्ये प्रवेश केलाय. तामिळनाडूतील भाजप नेते मुरलीधर राव आणि पोन राधाकृष्णन यांच्यासह भाजपच्या इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तिने भाजपत प्रवेश केला. 'पतंप्रधान नरेंद्र मोदींनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांच्या प्रेरणेतून भाजपमध्ये प्रवेश केला', असं वीरप्पनची मुलगी विद्याराणीने सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Veerappan daughter joins BJP


विविध पक्षांच्या जवळपास १ हजार कार्यकर्त्यांसह विद्याराणीनेही भाजपमध्ये प्रवेश केला. 'पीएमके' पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचाही यात समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवत आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच राज्यातील जनतेच्या सेवेसाठी राजकारणात यावं, असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांनी केलं होतं, असं विद्याराणी म्हणाली. विद्याराणी ही कृष्णगिरीमध्ये गेल्या एक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी शिकवणीचे वर्ग घेतेय. कुठल्याही जाती, धर्माचे असो, शिक्षणाच्या माध्यमातून गरीबांना मदत करण्याचा आपला विचार आहे, असं विद्याराणी म्हणाली. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिलंय. पक्षातील विद्याराणी यांच्या पदाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं राज्य भाजपचे सचिव के.एस. नरेंद्रन यांनी सांगितलं.

ऑपरेशन कोकून

कुख्यात वीपरप्पनला पकडण्यासाठी १९९० मध्ये विशेष कृती दल स्थापन (STF) करण्यात आलं होतं. कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्य सरकारांनी मिळून हे दल स्थापन केलं होतं. त्यावेळी जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी २००१मध्ये वीरप्पनला पकडण्यासाठी 'ऑपरेशन कोकून' राबवले होते. वीरप्पन हा तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागांमधील जंगलामध्ये सक्रिय होता. या भागात त्याने रॉबिन हूड सारखी स्वतःची प्रतिमा बनवली होती. यामुळे तो पोलिसांच्या हातून अनेकदा निसटला होता. वीरप्पनला राजकीय पाठिंबा होता. पट्टली मक्कल काची (PMK) आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी हे त्याचे समर्थक मानले जात होते. १९९७मध्ये करुणानिधी यांनी शरणागतीसाठी वीरप्पनला कालावधीही वाढवून दिला होता. तसंच वीरप्पन शरण येईल असं म्हणत त्यांनी त्याच्याविरोधातील एसटीएफची कारवाईही रोखली होती. पण १८ ऑक्टोबर २००४ मध्ये तामिळनाडू विशेष कृती दलाने वीरप्पनला घेरलं. यावेळी उडालेल्या चकमकीत वीरप्पन ठार झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज