अ‍ॅपशहर

विकासासाठी कदाप‌ि ‘पापाचा मार्ग’ नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर हल्लाबोल केला. आपल्या सरकारने ७००हून अधिक योजना लागू केला असल्याचे सांगतानाच, विकासासाठी ‘पापाचा मार्ग’ अवलंबणार नाही, त्यासाठी काही काम बाकी राहिले तरी चालेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Maharashtra Times 30 May 2016, 2:08 am
वृत्तसंस्था, देवनगिरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vikas parv in modi
विकासासाठी कदाप‌ि ‘पापाचा मार्ग’ नाही


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर हल्लाबोल केला. आपल्या सरकारने ७००हून अधिक योजना लागू केला असल्याचे सांगतानाच, विकासासाठी ‘पापाचा मार्ग’ अवलंबणार नाही, त्यासाठी काही काम बाकी राहिले तरी चालेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या व्दिवर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘विकास-पर्व’ कार्यक्रमाअंतर्गत एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी विकास हे आपले ‘स्वप्न, मार्ग आणि ध्येय’ आहे, असे सांगितले. आधीचे यूपीए सरकारने वेगवेगळ्या लॉबींच्या दबावापुढे झुकले असा आरोप करतानाच, संपूर्ण यंत्रणेतून दलालांची हकालपट्टी करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

‘मोदी मोठी कामे का करत नाहीत, असे मला विचारतील.. आधीच्या सरकारने मोठी कामे केली, पण ती फक्त बड्या व्यक्तींसाठीच केली.. त्यांनी त्याच्यापासून मोठे लाभ मिळवले. मी असे पाप करू का?’ असा सवाल जाहीर भाषणातून मोदी यांनी उपस्थितांना विचारला. गर्दीतून एकसुरात ‘नाही’ असे उत्तर आल्यावर, तुमच्यासारखे लोक आशीर्वाद देतात, तेव्हा पापाच्या मार्गावर जाण्याची मला गरज नाही, असे मोदी म्हणाले. भाजपच्या घोषणेचा उल्लेख करताना, ‘काँग्रेसमुक्त भारता’ची कामगिरी नागरिकांनीच आपल्या हाती घेतल्याचे मोदी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज