अ‍ॅपशहर

मोदी सरकारचे काही निर्णय चिंताजनक!: नसिरुद्दीन

'सध्याच्या सरकारचे पाठ्यपुस्तकातील बदलासारखे काही निर्णय चिंताजनक आहेत. मात्र, देशाला पुन्हा अंधारयुगात नेण्याइतके सत्ताधारी मूर्ख नाहीत. ते कोणताही चुकीचा पर्याय स्वीकारणार नाहीत,' अशी आशा हिंदी सिनेसृष्टीतील जुने-जाणते अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Times 28 May 2016, 11:43 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम we should give the government more time says naseeruddin shah
मोदी सरकारचे काही निर्णय चिंताजनक!: नसिरुद्दीन


'सध्याच्या सरकारचे पाठ्यपुस्तकातील बदलासारखे काही निर्णय चिंताजनक आहेत. मात्र, देशाला पुन्हा अंधारयुगात नेण्याइतके सत्ताधारी मूर्ख नाहीत. ते कोणताही चुकीचा पर्याय स्वीकारणार नाहीत,' अशी आशा हिंदी सिनेसृष्टीतील जुने-जाणते अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली आहे.

'वेटिंग' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दिल्लीत आले असता शाह यांनी मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाविषयी भाष्य केलं. 'लोक खूप लवकर निर्णय घेतात. ग्रह करून बसतात. पण घाईघाईनं एखादं मत बनविण्याऐवजी सरकारला थोडा वेळ द्यायला हवा,' असं शाह म्हणाले. 'आधुनिक भारताची निर्मिती की पुन्हा अंधारयुग हे दोनच पर्याय सरकारपुढं आहेत. यातील अंधारयुगाचा पर्याय स्वीकारण्याइतकं सरकार मूर्ख नाही. इतर कुणासाठी भलेही नाही, पण सत्तेसाठी तरी हे लोक असं करणार नाहीत. मी आशा सोडलेली नाही. आशा सोडली तर पराभव स्वीकारल्यासारखं होईल,' असं शाह म्हणाले.

'भारत माता की जय' व 'वंदे मातरम्' या घोषणांबद्दल विचारलं असता त्यांनी गीतकार जावेद अख्तर यांनी राज्यसभेत मांडलेल्या भूमिकेची आठवण दिली. 'कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्याच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार नाही. 'भारत माता की जय' किंवा 'वंदे मातरम्' या घोषणा मी माझ्या मर्जीनं देईन, कोणाच्या सांगण्यावरून नव्हे,' असं जावेद अख्तर म्हणाले होते. माझंही तेच मत असल्याचं शाह यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज